प्रभात वृत्तसेवा पुणे – नागरिकांचा सहभाग, संवाद आणि विश्वासातून प्रभागाच्या विकासाला गती देण्यात येईल. त्यासाठी वेळोवेळी कोपरा सभांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडविण्यातही येतील, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती शिंदे आणि कांता खिलारे यांनी उपस्थित नागरिकांना दिले. प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर परिसरातील स्वयंप्रभा सोसायटी, गिरीजा सोसायटी, स्नेह पॅराडाइज सोसायटीसह सुतारदरा येथील शिवसाईनगर परिसरात कोपरा सभांचे आयोजन करून हर्षवर्धन मानकर, तृप्ती शिंदे, कांता खिलारे यांनी नागरिकांशी संवाद साधला. सोसायटीतील समस्यांसह प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची कामे, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक समस्या, आरोग्य सुविधा, महिला व युवकांसाठीच्या योजनांसह विविध स्थानिक प्रश्नांवर चर्चा करून त्याची नोंद घेतली. या वेळी सोसायट्यांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दीपक मानकर यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे सोसायट्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे आवर्जून उल्लेख केला. “रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर प्रभागातील सर्वांगीण विकास दीपक मानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला आहे. त्याला आणखी वाढ देऊन प्रभागाच्या विकासाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे.” – हर्षवर्धन मानकर – राष्ट्रवादी काँग्रेस