PM Modi Iran US War: ‘मोदी आधी विचार करतात आणि मग …’, पंतप्रधानांनी दाखवला हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा ; अमेरिका-इराण युद्धावर काय म्हणाले?
PM Modi Iran US War: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील जिंद याठिकाणी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी यावेळी संबोधित करताना अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचाही उल्लेख केला.

PM Modi Iran US War: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील जिंद याठिकाणी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी यावेळी संबोधित करताना अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचाही उल्लेख केला.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी कार्यक्रमादरम्यान, “जर २०१४ पूर्वी मध्य-पूर्वेत युद्ध झाले असते, तर त्याचा रेल्वेवर मोठा परिणाम झाला असता, कारण त्यावेळी डिझेल इंजिनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता”. असे म्हटले आहे.
अमेरिका-इराण युद्धाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “मध्य-पूर्वेत युद्ध सुरू आहे. २०१४ मध्ये देशाचा मोठा भाग डिझेलवर चालत होता. आता कल्पना करा, जर डिझेलचा वापर थांबला असता, तर डिझेलवर चालणाऱ्या गाड्या कशा धावल्या असत्या? देश संकटात सापडला असता. पण ही २०१४ ची परिस्थिती नाही. हे मोदी आहेत, ते दूरचा विचार करतात आणि समस्यांवर उपायही शोधतात.” असे म्हणत विरोधकांना टोला लगावला.
मध्य-पूर्वेतील संकट असूनही भारतीय रेल्वे थांबली नाही PM Modi Iran US War:
ते म्हणाले, “गेल्या १२ वर्षांत भारताच्या रेल्वे नेटवर्कपैकी सुमारे ९९ टक्के नेटवर्कचे विद्युतीकरण झाले आहे. हरियाणातील रेल्वे नेटवर्कचे १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे. यामुळे युद्धे आणि तेलाच्या संकटातही भारताची रेल्वे थांबली नाही, भारताचा विकास थांबला नाही.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण १९२५ मध्ये, म्हणजे जवळपास १०० वर्षांपूर्वी सुरू झाले. १९२५ ते २०१४ या जवळपास ९० वर्षांच्या काळात देशाच्या रेल्वे नेटवर्कपैकी केवळ ३० टक्के नेटवर्कचे विद्युतीकरण झाले. ७० टक्के भाग डिझेलवर चालत होता.”
हायड्रोजन ट्रेनबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले ? PM Modi Iran US War:
पंतप्रधान म्हणाले, “२१ व्या शतकातील रेल्वे हायड्रोजनवर चालणारी असेल. जगात फक्त तीन-चार देश हायड्रोजन ट्रेन चालवतात. ही जगातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात लांब ट्रेन आहे.” देशाने १० डब्यांची रेल्वेगाडी चालवून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. ही प्रदूषणमुक्त रेल्वेगाडी एका भारतीय अभियंत्याने बांधली आहे.






