PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या कामाची बातमी.! अन्यथा पुढील हप्ते रखडणार; महत्त्वाची अपडेट आली समोर
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.

PM Kisan Yojana – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.
योजनेतील पारदर्शकता वाढवणे, गैरप्रकार रोखणे आणि केवळ खऱ्या व पात्र लाभार्थ्यांपर्यंतच आर्थिक लाभ पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यात २० मे पासून विशेष मोहीम राबविण्यास सुरूवात झाली आहे.
ई-केवायसी पूर्ण करण्याच्या दोन सोप्या पद्धती –
शेतकरी बांधवांना खालील दोन पैकी कोणत्याही एका पद्धतीने आपले प्रमाणीकरण पूर्ण करता येईल:
१. बायोमॅट्रिक पद्धत (सी.एस.सी केंद्र): शेतकरी आपल्या नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रावर जाऊन अंगठ्याच्या किंवा बोटांच्या ठशांद्वारे (बायोमॅट्रिक) ई-केवायसी करू शकतात.
२. फेस ऑथेंटिकेशन : शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर ‘पी.एम. किसान’ ॲप डाऊनलोड करून ‘चेहरा ओळख’ तंत्रज्ञानाद्वारे घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
ज्या वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी थेट घरी जाऊन ‘फेस ऑथेंटिकेशन’द्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत.
राज्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता ३० जूनपूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
३० जून हीच अंतिम मुदत :
चालू वर्षासाठीची (२०२५-२६) ही वार्षिक ई-केवायसी मोहीम ३० जूनपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शेतकरी आगामी हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.






