IPL vs Ranji Trophy : मनोज तिवारीचे आजच्या क्रिकेटपटूंवर टीकास्त्र, म्हणाला “आयपीएलचा मोठा करार मिळाला, की खेळाडू…”

IPL vs Ranji Trophy, Manoj Tiwari : – आजचे क्रिकेट हे पूर्णपणे प्रायोजक-प्रणित झाले असून कमी काळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात अनेक खेळाडू स्वत:चे नुकसान करुन घेत आहेत. एकदा का एखाद्याला आयपीएलचा करार मिळाला, की तो खेळाडू रणजी सामन्यांकडे दुर्लक्ष करतो. सीमारेषेवर अखेरच्या क्षणापर्यंत चेंडू अडवण्याची त्याची जिद्द नाहिशी होते आणि क्षेत्ररक्षण करताना कातडी-बचाव धोरण अवलंबले जाते, अशा शब्दांत निवृत्त क्रिकेटपटू मनोज तिवारीने ( Manoj Tiwari ) आजच्या क्रिकेटपटूंवर टीकास्त्र सोडले आहे.
श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी देशांतर्गत सामन्यांमधून तंदुरुस्ततासूनही अंग काढून घेतले. त्यांचाआयपीएलचा करार झालेला होता. त्यामुळे बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंना २०२३-२४ च्या हंगामातील कराराच्या यादीतून वगळले आहे. बीसीसीआयच्या ताज्या आदेशाची जगभरातून प्रशंसा झाली आहे. मनोज तिवारीनेही बीसीसीआयच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
एका खासगी वाहिनीशी बोलताना तिवारी म्हणाला की, मी तरुण आणि प्रस्थापित खेळाडूंना देशांतर्गत सामन्यांदरम्यान फक्त आयपीएलबद्दल बोलताना पाहिले आहे. झोन सामन्यांमध्येही, जेव्हा मी खेळायचो तेव्हा त्यांच्या चर्चा पूर्णपणे आयपीएलवर आधारित असतात. देशासाठीचे सामने, कसोटी क्रिकेट याबाबत हे खेळाडू गंभीररासल्याचे कधीच दिसले नाही.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/bangladesh-bowler-sujon-mahmud-bowls-bizarre-over-concedes-92-runs-in-four-deliveries/
रणजी ककरंडक स्पर्धेपूर्वी आयपीएलचे करार झाले की, खेळाडू बेफिकीर होतात. आयपीएल खेळायला मिळावे, म्हणून रणजीच्या वेळी हे खेळाडू दुखापतग्रस्त कसे काय होतात? रणजी सामन्यात ते चौकार अडवण्यासाठी डाईव्ह करतानाही कचरतात, तसे अनेकदा दिसून आलेले आहे.





