Pimpri: वारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वाहतुक बदलला, प्रवाशांची संयमाने साथ
Pimpri : वारकऱ्यांना साथ देणे ही आपली जबाबदारी; नागरिकांची भावना

पिंपरी : आषाढी वारीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात लाखो वारकरी दाखल झाल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले असून काही बसमार्गांवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले होते.
या बदलांचा परिणाम दैनंदिन प्रवास करणाऱ्या कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांवर झाला होता. बससेवेत बदल झाल्याने अनेकांनी रिक्षांचा पर्याय स्वीकारला असून वाढत्या मागणीमुळे काही मार्गांवरील रिक्षाभाडे नेहमीपेक्षा अधिक झाले आहे.
तरीही, वारकरी परंपरेबद्दल आदर व्यक्त करत नागरिकांनी संयम आणि सहकार्याची भूमिका घेतली आहे. “वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि भक्तीचा महोत्सव आहे. काही दिवसांचा हा बदल स्वीकारून वारकऱ्यांना साथ देणे ही आपली जबाबदारी आहे,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
Interrupted power supply : खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त




