वर्षा ऋतू जीवनधारांचे सिंचन करत येतो आणि मातीच्या गर्भात असणारे प्रत्येक बीज, कंदांना नवजीवनाचे अंकूर देतो. पावसाचे आगमन हळूहळू डोंगर, रानवाटा हिरव्यागार करीत जातात. साधारण ऑगस्टपासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुले, गवत, झुडपे, वेलींवर झुलताना दिसतात. अशीच नाणे मावळ नाणोली परिसरात बहरलेली रानफुले टिपली आहेत निसर्गप्रेमी दक्ष काटकर यांनी.