Girish mahajan : राज्यात अलीकडच्या काळात इंधन तुटवड्याच्या चर्चांनी नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या कथित टंचाईमुळे गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र सरकारने त्यावेळीच घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा पसरल्याने राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. पुणे, नाशिक, जळगावसह काही शहरांमध्ये वाहनचालकांनी खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्यास सुरुवात केली. अचानक वाढलेल्या मागणीमुळे अनेक पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या असून काही ठिकाणी पंपचालकांनी एका वाहनाला 200 ते 300 रुपयांपर्यंतच इंधन देण्याचा तात्पुरता निर्णय घेतला. यामुळे तुटवडा असल्याची भावना अधिक बळावली. Girish mahajan दरम्यान, राज्याचे मंत्री गिरीश महाजन ( Girish mahajan ) यांनी परिस्थितीबाबत स्पष्टीकरण देत नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्यक्षात कोणताही तुटवडा नाही. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिक घाबरून अतिरिक्त इंधन भरत आहेत आणि त्यामुळे कृत्रिम टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. Girish mahajan Gas Cylinder Shortage मंत्री महाजन यांच्या मते, मागील काही महिन्यांत इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या चार महिन्यांत मागणी जवळपास दीडपट वाढल्याने वितरण व्यवस्थेवर अचानक ताण आला. पेट्रोल पंपांकडे पुरेसा साठा असतानाही नागरिकांनी एकाच वेळी इंधन घेण्यास सुरुवात केल्याने रांगा लागल्या. त्यामुळे अतिरिक्त साठा करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Girish mahajan गॅस सिलेंडरबाबतही सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा नियमित सुरू असून कुठेही कमतरता नाही. केवळ कमर्शियल गॅसच्या पुरवठ्यात काही प्रमाणात अडचणी असल्याचे सांगण्यात आले आहे. पर्यायी उपाय म्हणून रॉकेलचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही मंत्री महाजन यांनी नमूद केले. नागरिकांना घरपोच सिलेंडर सेवा सुरू असल्याने एजन्सीबाहेर गर्दी करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. Girish mahajan petrol सरकारने सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरवल्यास संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अफवांमुळे निर्माण होणारी घबराट पुरवठा साखळीवर अतिरिक्त दबाव आणते आणि सेवा विस्कळीत होण्याचा धोका वाढतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्याच्या परिस्थितीकडे पाहता राज्यात प्रत्यक्ष इंधन टंचाई नसून नागरिकांच्या घबराटीमुळे मागणी अचानक वाढल्याचे चित्र आहे. तेल कंपन्यांकडून नियमित पुरवठा सुरू असून वाहतूक आणि वितरण यंत्रणा सुरळीत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आणि गरजेपुरतेच इंधन घेण्याचे आवाहन केले आहे. Girish mahajan