Operation Sindoor : “आमचा आत्मविश्वास अधिक मजबूत झाला”; पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पिडितांच्या भावना

नवी दिल्ली – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कानपूर येथील व्यापारी शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचे त्यांच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल आभार मानले.
शुभमची पत्नी ऐष्ण्या म्हणाली, माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी, मंत्री आणि हवाई दलासह सशस्त्र दलांच्या प्रमुखांचे आणि लष्करप्रमुख जनरल यांचे आभार मानू इच्छिते.
मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या सशस्त्र दलांवर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ज्या पद्धतीने हल्ला केला त्यामुळे आमचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.
मला फक्त त्याचा हिशेब हवा आहे
काल मध्यरात्री जे काही घडले ते बरोबर होते, पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांनाही संपवले पाहिजे. मला फक्त याचा हिशोब हवा आहे आणि या लोकांनाही तीच शिक्षा मिळाली पाहिजे.
या चौघांनाही मरावे लागेल. या चौघांनी जे केले आहे ते प्राणीही कधी करू शकत नाहीत, असे सुशील नॅथॅनियल यांच्या विधवा जेनिफर नॅथॅनियल (५४) यांनी इंदूरमध्ये सांगितले.
नॅथॅनियल हे इंदूरपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या अलिराजपूर येथे भारतीय जीवन विमा महामंडळाचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते स्वत:, त्यांची पत्नी जेनिफर, मुलगी आकांक्षा (३५) आणि मुलगा ऑस्टिन उर्फ गोल्डी (२५) यांच्यासोबत काश्मीरला गेले होते.





