Dilip Walse-Patil | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र महायुतीसह महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर लढणार? याबाबत चर्चा सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येत्या काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील पक्षांशी आघाडी झाली तर ठिक अन्यथा राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे ‘नवसंकल्प शिबिर’ शिर्डी येथे सुरू झाले आहे. यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील हे सुद्धा शिर्डीला पोहचले आहेत. यावेळी वळसे पाटील यांनी केलेल्या विधानानंतर चर्चांना उधाण आले आहे. Dilip Walse-Patil | काय म्हणाले दिलीप वळसे पाटील ? राष्ट्रवादीच्या या अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी दिलीप वळसे-पाटील यांनी साई बाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “आज आणि उद्या होणाऱ्या या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही निवडणुकीची रणनीति ठरवणार आहोत.” पुढे ते म्हणाले, “सध्या ओबीसी आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे या खटल्याच्या निकालानंतर निवडणुकीची प्रक्रिया आणि कसे लढायचे याबाबत निर्णय होईल. पण जर आघाडी झाली तर ठीक, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे,” असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. Dilip Walse-Patil | यानंतर त्यांना धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणीने जोर धरला आहे. याबाबत विचारले असता, त्यावर वळसे पाटील यांनी बीडमध्ये जे झालं ते गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा शोध लागला पाहिजे आणि दोषींना शिक्षाही झाली पाहिजे. पण जोपर्यंत एखादा व्यक्ती दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर आरोप करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. Dilip Walse-Patil | हेही वाचा: rakhi sawant : सैफ प्रकरणावर राखीची प्रतिक्रिया; इमारतीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, म्हणाली तुम्ही इतके पैसे घेता आणि…