Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? राजकीय घडामोडींना वेग
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तब्बल २० वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा आज अखेर निकाल (Omraje Nimbalkar) लागला आहे. न्यायालयाने पुराव्याअभावी या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

Omraje Nimbalkar : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तब्बल २० वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा आज अखेर निकाल (Omraje Nimbalkar) लागला आहे. न्यायालयाने पुराव्याअभावी या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
या धक्कादायक निकालानंतर राजकारणात कमालीच्या घडामोडी घडत असून, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे.
20 वर्षांनंतर लागलेला निकाल अन् निंबाळकर कुटुंबाला धक्का
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज दोन दशकांनंतर (२० वर्षांनी) न्यायालयाने आपला अंतिम निर्णय सुनावला. खटल्यादरम्यान आवश्यक पुराव्यांचा अभाव असल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष सोडून दिले. या निकालामुळे निंबाळकर (Omraje Nimbalkar) कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, या निर्णयाविरोधात आगामी काळात ते उच्च न्यायालयात (हायकोर्टात) दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कैलास पाटलांच्या फोनवरून आदित्य ठाकरे अन् ओमराजेंमध्ये चर्चा
न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तातडीने घडामोडींची दखल घेतली. ओमराजे निंबाळकर यांच्या एका अत्यंत जवळच्या कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या मोबाईल फोनवर आदित्य ठाकरे यांचा फोन आला होता.
याच फोनवरून आदित्य ठाकरे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात सविस्तर चर्चा झाली. आदित्य ठाकरेंनी आज लागलेल्या निकालाबाबत ओमराजेंकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या संवादाला राजकीय महत्त्व
ठाकरे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये ९ पैकी ६ खासदार फुटल्याची जोरदार चर्चा आहे, आणि धक्कादायक बाब म्हणजे यात खासदार ओमराजे निंबाळकर यांचेही नाव घेतले जात आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यातूनही ओमराजे निंबाळकर यांच्यावर थेट आणि जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते.
या टीकेला आणि पक्षांतराच्या चर्चांना काही तास उलटत नाहीत, तोच आदित्य ठाकरे यांनी स्वतः फोन करून ओमराजे निंबाळकर यांच्याशी साधलेला हा संवाद अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या संवादाने निंबाळकर आणि ठाकरे गटातील तणाव निवळणार की पडद्यामागे काही वेगळ्या राजकीय हालचाली सुरू आहेत, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






