पुणे – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झालेला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत होती. मात्र या निवडणुकीत विजयी होण्याचे भाजपचे स्वप्न अपूर्णच राहिले. यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट केले आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट केले आहे की,’स्वाभिमानी कोल्हपुर मतदार,आणि खऱ्या चांगल्या नीतिमत्ताचे महाविकास आघाडीने श्रीमती जयश्री जाधव ताईच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली.मग ती माऊली विजयी झाल्याशिवाय राहीलच कशी हो. असेच एकदिलाने,ताकतीने उभे रहा नक्कीच भाजपचा भस्मासुर नस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही’ असं ट्विट करत रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजप टीका केली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांचे ट्विट
स्वाभिमानी कोल्हपुर मतदार,आणि खऱ्या चांगल्या नीतिमत्ताचे महाविकास आघाडीने
श्रीमती जयश्री जाधव ताईच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली.मग ती माऊली विजयी झाल्याशिवाय राहीलच कशी हो.
असेच एकदिलाने,ताकतीने उभे रहा
नक्कीच भाजपचा भस्मासुर नस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही#अभिनंदन #सर्वांचे— Rupalipatilthombare (@Rupalispeak) April 16, 2022