मुंबई – आयसीसीच्या 2023 साली होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे ( ODI World Cup ) यजमानपद भारताला मिळाले आहे. 1987, 1996 व 2011 या तीन स्पर्धांचे यजमानपदही भारताकडेच होते मात्र, त्यावेळी बीसीसीआयने पाकिस्तान व श्रीलंका मंडळासह संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली होती. आता मात्र, पुढील वर्षी होत असलेल्या स्पर्धेचे आयोजन केवळ भारतातच होणार आहे, असे बीसीसीआयने घोषित केले आहे.
“पॉलीला बॉलिंग करणं सोपी गोष्ट नव्हती…”, चहलचा पोलार्डला खास मॅसेज
भारतातील तब्बल दहा शहरांत या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा सलामीचा सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. उपांत्य फेरीचे ( ODI World Cup ) सामने अनुक्रमे 23 व 24 नोव्हेंबरला तर अंतिम लढत 26 नोव्हेंबरला होइल. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर होणार असल्याचे सांगितले जात असले तरीही त्याबाबत अद्याप बीसीसीआयने काहीही जाहिर केलेले नाही. मात्र, उपांत्य फेरीचा सामना ईडन गार्डनवरच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अंतिम सामन्याच्या आयोजनासाठी कोलकातासह दिल्ली व मुंबईचेही नाव चर्चेत असून याबात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
या शहरांत होणार ( ODI World Cup ) सामने
– इकाना स्टेडियम, लखनौ
– ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर
– इडेन गार्डन, कोलकाता
– एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
– अरूण जेटली स्टेडियम, दिल्ली
– नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
– राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद
– वानखेडे स्टेडियम, मुंबई
– पीसीए स्टेडियम, मोहाली पंजाब
– एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरू