Sarpanch News : आता सरपंचच असणार प्रशासक! राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे, अश्या ठिकाणी विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. यामुळे ग्रामपातळीवर प्रशासनात सातत्य राहणार असून अचानक बदलामुळे निर्माण होणारी पोकळीही टळणार आहे.

Sarpanch News : राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे, अश्या ठिकाणी विद्यमान सरपंचालाच (Sarpanch News) प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. यामुळे ग्रामपातळीवर प्रशासनात सातत्य राहणार असून अचानक बदलामुळे निर्माण होणारी पोकळीही टळणार आहे.
या परिपत्रकानुसार हा निर्णय सध्या 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीच लागू राहणार आहे. या कालावधीत प्रशासक आणि प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असणार आहेत. जानेवारीच्या परिपत्रकानुसार, 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.
मात्र, राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या आणि अधिकाऱ्यांची उपलब्धता लक्षात घेता प्रशासनासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारने हा सुधारित निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ग्रामपंचायतीची मुदत संपण्याच्या दिवसापर्यंत जे सरपंच पदावर असतील, त्यांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात येईल. त्यांच्या मदतीसाठी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन केली जाणार आहे.
तसेच, प्रशासक आणि प्रशासकीय समितीचा कालावधी त्यांच्या नेमणुकीपासून सहा महिने किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्ण होईपर्यंत, जे आधी होईल तो असणार आहे. यामुळे प्रशासनात सातत्य, पारदर्शकता आणि वेग राखला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





