“निवडणुकीत जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नका” ; संघाकडून भाजपला अत्यंत महत्वाच्या सूचना

Notice to BJP from RSS । राज्यात आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे . दरम्यान , याच पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यात काल एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत आरएसएसने भाजपला महत्वाच्या सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण या सूचनांचा येत्या विधानसभेत पक्षाला फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे.
नागपुरात संघ पदाधिकाऱ्यांच्यासोबतच्या बैठकीत भाजपला सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आलेल्या सूचनांमध्ये निवडणुकीत जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नये. भाजपच्या जुन्या कॅडरच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष नको, अशा सूचना भाजपला दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे संगठन कामाला लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपच्या तयारी आणि नियोजनाचा आढावा घेत आहे. यामध्ये काल (10 ऑक्टोबर) नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघातील तयारी, नियोजन, सामाजिक समीकरण आणि करावयाच्या कामांचा आढावा संघाकडून घेण्यात आला.
बैठकीतील चर्चेचे महत्वाचे मुद्दे Notice to BJP from RSS ।
* निवडणुकांच्या दृष्टीने जातीय समीकरण जुळवताना भाजपने मूळ हिंदुत्वाच्या विचारापासून दूर जाऊ नये अशी सूचना संघाकडून करण्यात आल्याची माहिती आहे.
* भाजपने उमेदवारी कुणाला द्यावे तो पक्षाचा प्रश्न आहे. मात्र मूळ कॅडरकडे दुर्लक्ष नको अशी अपेक्षा संघाने व्यक्त केल्याची माहिती आहे.
* समाज माध्यमांवर केवळ लाईक करून चालणार नाही. त्यावर कार्यकर्त्यांनी व्यक्त व्हायला हवे. लोकसभेच्या वेळेला विरोधकांकडून आरक्षणाबद्दल जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अशा विषयांना तथ्यांवर आधारित उत्तरे देत जनतेतील संभ्रम दूर करण्यावर भर द्यावा, अशी सूचना देखील संघाकडून करण्यात आल्याची माहिती आहे.
* लोकसभा निवडणूकीत ज्या बुथवर भाजपला मताधिक्य होते, तेथील मतदानाची टक्केवारी कमी होती. तर भाजपला मताधिक्य नव्हते त्या बूथवर जास्त मतदान झाले. म्हणजेच भाजपचा मतदार असलेल्या भागातील लोक हव्या त्या प्रमाणात मतदान करायला बाहेर निघाले नाही किंवा भाजपला त्यांना मतदानकेंद्रांपर्यंत नेता आले नाही. त्यामुळे मताधिक्य असलेल्या बुथवरील मतदानाचा टक्का वाढवा, असे ही संघाकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे.
मागच्या दोन वर्षात राजकीय पडझड Notice to BJP from RSS ।
दरम्यान, राज्यात मागील दोन वर्षांचा सर्वच राजकीय पक्षांचा लेखजोखा पाहिला तर सर्वच पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. या सर्व घडामोडींचा परिणाम सर्व पक्षावर पडला असून हेच नुकसान भरून काढण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहे.





