Guillain-Barre Syndrome : एनआयव्हीच्या तपासणीत दुर्मिळ आजाराचे मूळ कारण समोर; धोका किती जाणून घ्या..!

पुणेः शहरात गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने थैमान घातले असून, दररोज रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. या दुर्मिळ आजाराची लागण नेमकी कशामुळे होत आहे याचे कारण आता समोर आले आहे. या आजाराचा संसर्ग कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचे उघड झाले आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीत ही माहिती समोर आली आहे. तसेच हा विषाणू दूषित अन्न व पाण्यातून पसरत असल्याचे सांगण्यात आले आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णांच्या चेतासंस्थेवर हा विषाणू हल्ला करतो. यामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती कमी होती. गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजारामध्ये तपासणीत आलेल्या रक्ताच्या काही रुग्णांना कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी जीवाणू तर काही रुग्णांमध्ये नोरोव्हायरस या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हीची लक्षणेही पोटदुखी, उलट्या आणि जुलाब ही आहेत.
या आजाराची लागल झाल्यानंतर जीवाणू अथवा विषाणू सर्वप्रथम शरीरातील चेतासंस्थेवर हल्ला केला करते. त्यानंतर शरीरात या आजाराची लक्षण दिसून येतात. त्यानंतर १ ते ३ आठवड्यांनी गुइलेन बॅरे सिंड्रोम होतो. त्यानंतर हात, पाय, गळा, तोंड आणि डोळे या भागात अशक्तपणा जाणवतो. हातापायाला मुंग्या येतात अथवा ते बधीर पडणे अशी काही लक्षणे दिसून येतात.
तसेच या आजाराने बाधित असणाऱ्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास जाणवतो. अन्न गिळतानाही त्रास जाणवतो. जशी लक्षण आहेत. त्यानुसार यावर उपचार केले जातात. आयव्हीआयजी इंजेक्सन अथवा प्लाझ्मा बदलणे असे उपचार केले जातात. असे उपचार रुग्णांवर केल्यानंतर रुग्ण बरा होतो.
नोरोव्हायरसचा
जीबीएस रुग्णांमध्ये नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला आहे. बाधित रुग्णाने उलटी केल्यास हा विषाणू हवेत पसरून इतरांनाही याचा संसर्ग होऊ शकते. हा संसर्ग झाल्यानंतर १ ते ३ दिवसांमध्ये रुग्ण बरा होतो. तर काही रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढत जाऊन गुइलेन बॅरे सिंड्रोम होतो.
कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी
कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी या जीवाणूचा संसर्ग दूषित पाण्यातून अथवा दूषित अन्नामधून होतो. या जीवाणूचा संसर्ग ५ वर्षांखालील लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. तसेच या संसर्गामुळे मृत्यूचेही प्रमाण अतिशय कमी आहे. २ ते ५ दिवसांमध्ये रुग्ण बरा होतो. मात्र, काही रुग्णांना गइलेन बॅरे सिंड्रोमची बाध होते.





