‘अरे, तुमचे वडील मुख्यमंत्री असताना…’ ; मतदार यादीवरील तेजस्वीच्या आरोपांवर नितीशकुमार विधानसभेत संतापले

Nitish Kumar-Tejasavi Yadav। बिहार विधानसभेत आज मतदार यादी पुनरीक्षणावरून प्रचंड गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या प्रक्रियेत मागवल्या जाणाऱ्या ११ कागदपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी यावेळी बोलताना,”गरीब लोक इतके कागदपत्रे कुठून आणतील? असा सवाल यावेळी केला. तसेच त्यांनी आरोप केला की बिहार या प्रकरणात खूप मागे आहे. याचे उत्तर न देता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तेजस्वी यांना त्यांच्या “पालकांच्या कार्यकाळात” लक्ष घालण्याचा सल्ला दिला.
तेजस्वी यादव यांनी यावेळी बोलताना, “संविधानाने सर्व नागरिकांना मतदानाचा समान अधिकार दिला आहे. आम्ही एसआयआर प्रक्रियेला विरोध करत नाही आहोत, परंतु निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर निश्चितच प्रश्न आहे. २००३ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड वर्ष लागले. सध्या बिहारमध्ये पावसाळा आहे, लोक फॉर्म कसा भरतील?” असा प्रश्न उपस्थित केला.
तसेच पुढे बोलताना तेजस्वी यांनीही प्रश्न उपस्थित केला की, “आधार आणि रेशनकार्ड या प्रक्रियेशी का जोडले जात नाहीत? निवडणूक आयोगाने यावर पत्रकार परिषद घेतली पाहिजे होती.” ते असेही म्हणाले, “लोकांना बांगलादेशी, नेपाळी आणि म्यानमारी म्हटले जात आहे, हे खूप आक्षेपार्ह आहे.” असेही त्यांनी म्हणत राज्य सरकारवर टीका केली.
नितीशकुमार यांनी लालू-राबडींच्या कार्यकाळाची आठवण करून दिली Nitish Kumar-Tejasavi Yadav।
तेजस्वींच्या आरोपांवर मुख्यमंत्री नितीशकुमार संतापले. त्यांनी तेजस्वींना त्यांच्या पालकांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली. याविषयी बोलताना त्यांनी, “तुम्हाला तुमचे पालक मुख्यमंत्री असतानाची परिस्थिती माहित आहे का? तेव्हा तुम्ही लहान होता. आम्ही जे काही काम केले आहे ते आम्ही जनतेसमोर घेऊन जाऊ.” असेही त्यांनी म्हटले.
नितीशकुमार म्हणाले, “जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर बकवास बोलत राहा. आम्ही महिलांसाठी किती केले आहे, मुस्लिमांसाठी किती केले आहे. जेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता तेव्हा तुम्ही आमचे कौतुक करायचे. आता काय झाले?”असे म्हणत त्यांनी तेजस्वी यांच्यावर पलटवार केला.
जेव्हा नितीशकुमारांनी तेजस्वी यादव यांना बाळ म्हटले… Nitish Kumar-Tejasavi Yadav।
मुख्यमंत्र्यांनी तेजस्वींना आव्हान दिले आणि म्हणाले, “पूर्वी पाटण्यात महिला संध्याकाळनंतर बाहेर जात नव्हत्या. आम्ही ती परिस्थिती बदलली. तुम्ही बाळ आहात, तुम्हाला काय माहित?” नितीशकुमार यांनी तेजस्वीला सांगितले तेव्हा विधानसभेतील ही चर्चा अधिकच तापली, “तुमचे वय काय आहे? तुमचे वडील आणि आई मुख्यमंत्री होते. आम्ही मुख्यमंत्री झालो तेव्हा बिहारमध्ये काम झाले होते.” तसेच “अरे, काय म्हणतोयस भाऊ, तू लहानपणी काय पाहिलं होतंस? आम्ही तुला आमच्याकडे ठेवलं होतं, पण काम होत नव्हतं म्हणून आम्ही तुम्हाला सोडून दिलं.” असेही त्यांनी म्हटले.





