मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी काल मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. आदित्य ठाकरे यांची दिशाच्या मृत्यू प्रकरणात चौकशी केली जावी, असे दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेत म्हंटले आहे. या प्रकरणात आता भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी गंभीर दावे केले आहे. काय म्हणाले नितेश राणे? दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरेंनी एकदा नाही तर दोन वेळा नारायण राणे यांना फोन केला. माझ्या मुलाला यातून वाचवा. मलाही दोन मुलं आहेत, तुम्हालाही दोन मुलं आहेत. माझ्या मुलाकडून काही चूक झाली असेल तर त्याला वाचवा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना केली होती. खुद्द नारायण राणे यांनीच जाीहरपणे ही गोष्ट सांगितल्याचे नितेश राणे म्हणाले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही महिलेने आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार दिली तर तत्काळ अटकेची कारवाई होते. मग सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश यावेळी का पाळण्यात आला नाही? आम्ही राजकीय आरोप करतोय, असे उद्धव ठाकरे यांना जर वाटत आहे तर त्यांनी नारायण राणे यांना दोन वेळा फोन का केले? असा सवाल नितेश राणे यांनी यावेळी उपस्थित केले. काय आहे नेमके दिशा सालियन प्रकरण? दिशा सालियन प्रकरण हे एक हायप्रोफाईल आणि वादग्रस्त प्रकरण आहे. 8 जून 2020 रोजी दिशा सालियन हिचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला. तिचा खून झाला कि तिचा मृत्यू झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. दिशा सालियन ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका उंच इमारतीवरून पडून तिचा मृत्यू झाला. ती पडली कि तिला वरतून खाली फेकले हे अद्याप रहस्य आहे. पोलिसांनी सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे सांगून अपघाती मृत्यूचा अहवाल (ADR) दाखल केला. तथापि, या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. यानंतर हे प्रकरण राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरण बनले. घटनेच्या वेळी दिशा हि होणारा नवरा रोहन राय आणि तिची मैत्रीण यांच्यासोबत रोहन रायच्या अपार्टमेंटच्या 14व्या मजल्यावर पार्टी करत होते. यादरम्यान ही घटना घडली.