Nilesh Rane : वैभव नाईकांच्या ‘गद्दारीचा कलंक’ वक्तव्यावर निलेश राणे प्रचंड संतापले; थेट म्हणाले, ‘हा तर…’
Nilesh Rane : या टीकेवर आता वैभव नाईक यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Nilesh Rane on Vaibhav Naik : नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी गद्दारीचा कलंक लावून आमदारकी नको होती असे म्हणत आपल्याचा शिंदे गटातून अॅाफर मिळाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर कोकणातील स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, त्यांनी केलेल्या या दाव्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार निलेश राणे यांनी त्यांना सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
“माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही” हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे. वैभव नाईक हरणारच होता म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही आणि त्यावर हा नीच आहे हे सगळ्यांना माहीत आहे, अशा शब्दांत निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर हल्लाबोल केला. या टीकेवर आता वैभव नाईक यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नेमकं काय म्हणाले होते वैभव नाईक?
माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांना एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी अनेकवेळा बोलावण्यात आले होते, परंतु त्यांना गद्दारीचा कलंक लावून आमदारकी नको होती. दसरा मेळाव्यापर्यंत, अगदी लोकसभा निवडणुकीनंतरही, भरत गोगवले यांनी मला फोन केला होता आणि त्यांनी ही बाब मान्य केली आहे, असे वैभव नाईक म्हणाले होते.
हा दावा करताना त्यांनी शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यावर टीका केली होती. निलेश राणे यांना आणि त्यांच्या वडिलांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले होते. निलेश राणे यांनी आमदारकी मिळवण्यासाठीच भारतीय जनता पार्टीतून सोडचिठ्ठी देऊन शिंदे सेनेतून निवडणूक लढवली, असा मोठा दावा केला. तसेच ते म्हणाले “मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे आणि यापुढेही राहीन.
“माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही” हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे. वैभव नाईक हरणारच होता म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही आणि त्यावर हा नीच आहे हे सगळ्यांना माहीत आहे.
ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून हा…— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 20, 2026
या दाव्यावर निलेश राणे यांनी सोशल मीडिया एक्सवरुन कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले “माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही” हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे. वैभव नाईक हरणारच होता म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही आणि त्यावर हा नीच आहे हे सगळ्यांना माहीत आहे.”
इथून पुढे काही बोलला तर…
पुढे निलेश राणे म्हणाले की, “ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून हा दुसऱ्या पक्षात गेला, हा घंट्याचा निष्ठावान. याला आता जिल्ह्यात कुत्र उभ करत नाही, हा ग्रामपंचायतीला पडेल याची अशी परिस्थिती झाली आहे, याचे दोन भाऊ माझ्यामुळे नगरसेवक झाले ते पण हा नमकहराम विसरला पण असो मी लहान लोकांच्या तोंडी लागत नाही, इथून पुढे काही बोलला तर माझे पदाधिकारी उत्तर देतील.” अशा शब्दांत इशारा दिला. पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिले की, आणि हो रवी चव्हाण साहेबांचा खरा लाभार्थी वैभव आहे हे जग जाहीर आहे.
Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी पहिल्यांदाच साकारणार महात्मा गांधीजींची भूमिका





