“पाकिस्तानने १९९९ साली लाहोर कराराचे उल्लंघन केलं”; कारगिल युद्धाच्या 25 वर्षानंतर पाकिस्तानची कबुली

Nawaz Sharif on India-Pakistan। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी कबूल केले. इस्लामाबादने 1999 मध्ये त्यांनी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केलंय. जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिलमध्ये केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात त्यांनी हे स्पष्ट केले.
सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षाच्या महापरिषदेला संबोधित करताना शरीफ यांनी हा कबुलनामा दिलाय. यावेळी म्हणाले, “28 मे 1998 रोजी पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर वाजपेयी साहेबांनी येथे येऊन आमच्याशी करार केला, मात्र आम्ही त्या कराराचे उल्लंघन केले. ती आमची चूक होती.” असे त्यांनी म्हटले.
नवाझ शरीफ काय म्हणाले? Nawaz Sharif on India-Pakistan।
पाकिस्तानच्या अणुचाचण्यांच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त नवाझ शरीफ म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला अणुचाचण्या करण्यापासून रोखण्यासाठी पाच अब्ज अमेरिकन डॉलर्सची ऑफर दिली होती, पण मी नकार दिला. माझ्या जागेवर (माजी पंतप्रधान) इम्रान खान यांच्यासारखा माणूस असता तर त्याने क्लिंटन यांची ऑफर स्वीकारली असती.
काय होता करार? Nawaz Sharif on India-Pakistan।
खरे तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २१ फेब्रुवारी १९९९ रोजी लाहोर करारावर स्वाक्षरी केली होती. दोन्ही देशांमधील शांतता आणि स्थैर्याचे दर्शन घडविणाऱ्या या कराराने मोठे यश मिळवण्याचे संकेत दिले, मात्र काही महिन्यांनंतर जम्मू-काश्मीरमधील कारगिलमध्ये पाकिस्तानी घुसखोरीमुळे कारगिल युद्ध सुरू झाले.
शरीफ यांची पीएमएल-एनच्या अध्यक्षपदी निवड
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. नवाझ शरीफ यांची तब्बल सहा वर्षांनी पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.





