मुंबई – माझ्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्यांना नोटीस पाठवणार, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. माझ्यावर अशा प्रकारच्या आरोपाचा कोणताही खटला दाखल नाही. माझ्यावर दाऊदशी संबंध असल्याचा किंवा त्यासंबंधीत आरोप करणाऱ्यांवर मी न्यायिक कारवाई करणार आहे. त्यांच्याविरोधात मी न्यायालयात धाव घेणार असून त्यांच्यावर बदनामीचा खटला टाकणार आहे. कितीही मोठा नेता असला, तरी नोटीस पाठवेन, असा इशाराही मलिकांनी नेत्यांना दिला आहे. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचे निवडणुकीत आव्हान राहिल का? या प्रश्नावर उत्तर देतात मलिक म्हणाले की, निवडणूक हे आव्हानच असते, पण शिवाजी नगर मानखुर्द मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय लोकांच्या आग्रहास्तव घेतला आहे. आज या मतदारसंघात महिला तक्रार घेऊन गेल्यास तिचे कपडे फाडले जातात, त्यांचे नगरसेवक काठ्या घेऊन लोकांना धमकावतात, ड्रग्सचे साम्राज्य निमार्ण झाले आहे. अशाप्रकारची गुंडशाही सुरू आहे. ही गुंडशाही संपवण्यासाठी, ड्रग्समुक्त शिवाजीनगरसाठी मी निवडणूक लढत आहे आणि मी ही निवडणूक जिंकणार, असा दावा नवाब मलिक यांनी केला. Maharashtra Election 2024 : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवा, निवडणूक आयोगाकडे ‘या’ पक्षानं केली पुन्हा मागणी… माझ्या प्रचाराला या असा आग्रह नाही… भाजपच्या नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही, या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी माझा प्रचार नाही केला तरी काही हरकत नाही. माझ्या प्रचाराला या, असा मी आग्रह देखील धरत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असून जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढत आहे. पण दाऊदशी नाव जोडणाऱ्यांवर मी कायदेशीर कारवाई करणार, असा पुनरुच्चार मलिकांनी केला. मी उमेदवारी मागे घेणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नात्याने निवडणूक लढत आहे, असेही ते म्हणाले.