Nasir Hussain : जम्मू काश्मीरमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर; कॉंग्रेस सरचिटणीस नासीर हुसेन यांनी केले स्पष्ट

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये पक्ष संघटना मजबूत (Nasir Hussain) करण्यासोबतच भविष्यातील रणनीतीवर काम केले जात आहे. जेव्हा पक्ष एकट्याने निवडणूक लढण्याच्या स्थितीत असेल तेव्हाच आम्ही भाजपला पराभूत करू शकू असे विधान जम्मू काश्मीर कॉंग्रेसचे प्रभारी आण राज्यसभा खासदार नासिर हुसेन (Nasir Hussain) यांनी केले आहे. विशेष म्हणजे या राज्यात कॉंग्रेसची नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती आहे.
श्रीनगरमध्ये एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, हा पक्षाचा कार्यक्रम आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पक्ष मजबूत करण्यास सांगितले आहे. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आमचे हायकमांड योग्य निर्णय घेतील. युती होईल की नाही, हे पक्षाचे हायकमांड ठरवेल. युती असेल की नाही, आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे.
नासिर हुसेन पुढे म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या आहेत. निकाल आले आहेत, सरकार स्थापन झाले आहे. येत्या काळात काय करायचे याची रणनीती आम्ही बनवत आहोत. जम्मू आणि काश्मीरसाठी समान रणनीती असेल. नासिर हुसेन हे काँग्रेसचे सरचिटणीस देखील आहेत. ते पक्षाचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचे प्रभारी देखील आहेत. त्यांचे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी (२४ जून) म्हटले होते की जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा पुनर्संचयित केल्यानंतर, जर विधानसभा बरखास्त केली गेली आणि नव्याने निवडणुका घेतल्या गेल्या तर त्यांना कोणताही आक्षेप नाही.
पहलगाम हल्ल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात नासिर हुसेन म्हणाले, आमच्या पक्षाने (Nasir Hussain) अगदी स्पष्ट भूमिका घेतली आहे. पहलगाम हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे झाला. सरकार तसेच गुप्तचर यंत्रणेचे अपयश होते असे ते मानतात. सुरक्षेत त्रुटी होती. गृहमंत्र्यांनी स्वतः म्हटले होते की ते गुप्तचर यंत्रणेचे अपयश होते. सीआरपीएफ तिथे नव्हते. तिथे पोलिस किंवा सैन्य नव्हते. जर ते सीमा ओलांडून आपल्या २६ लोकांना मारून निघून गेले, तर हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही तर काय आहे असा सवाल त्यांनी केला.





