Narendra Modi : भारताची राजनैतिक प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करा; काँग्रेसचे मोदी सरकारला आवाहन
ग्लोबल साउथमधील भागीदारांचा विश्वास पुन्हा जिंकून भारताचे पूर्वीचे राजनैतिक स्थान आणि प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन काँग्रेसने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला केले.

Narendra Modi : ग्लोबल साउथमधील भागीदारांचा विश्वास पुन्हा जिंकून भारताचे पूर्वीचे राजनैतिक स्थान आणि प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन काँग्रेसने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला केले. काँग्रेसने म्हटले की, ब्रिक्स सदस्य असलेल्या इराणवरील हल्ल्यांचे भारताने अप्रत्यक्षपणे समर्थन केल्याच्या निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष पावले उचलली पाहिजेत.
तसेच, संकटाच्या काळातही भारत एक विश्वासार्ह आणि विधायक भागीदार राहिला आहे, हे भारताने सिद्ध केले पाहिजे. तसेच ब्रिक्स शिखर परिषदेच्या निष्कर्षांची देशाला माहिती देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) पत्रकार परिषद घ्यावी, अशी मागणीही काँग्रेसने केली.
सलमान खुर्शीद म्हणाले, पश्चिम आशियातील युद्धात मोदी सरकारची राजनैतिक भूमिका मर्यादित राहिली आहे. त्यामुळे ब्रिक्स सदस्यांमध्ये एकमत घडवून आणण्याची त्यांची तयारी दिसून आलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ग्लोबल साउथचा आवाज बनले पाहिजे, ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची दीर्घकाळापासूनची भूमिका पुन्हा मांडली असली, तरी काँग्रेसचा ठाम विश्वास आहे की केवळ एकजुटीची घोषणा करून चालणार नाही, तर त्याला सातत्यपूर्ण आणि परिणामकारक कृतीची जोड दिली पाहिजे. याच भावनेतून मोदी सरकारने भारताचे ऐतिहासिक राजनैतिक स्थान आणि प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे खुर्शीद म्हणाले.






