नगर – तालुक्यातील कान्हेगाव शिवारात आदिवासी कुटुंबातील तीन लहानग्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी ही घटना घडली. दुपारी उशिरा घटना उघडकीस आली. त्यामुळे कान्हेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
चैतन्य अनिल माळी (वय 10 वर्ष), दत्ता अनिल माळी (वय 8 वर्ष) व चैतन्य श्याम बर्डे (वय 8 वर्ष) अशी त्या मृत लहानग्यांची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, कान्हेगाव येथील अतुल बाळासाहेब खरात यांच्या शेततळ्यात खेळण्यासाठी गेलेले लहान मुले पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.
ही माहिती मिळताच ग्रमस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पाहाणी केली. काही वेळानंतर पोलिसांनी स्थानिक तरुणाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून येथील कामगार रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी पाठविले, अशी माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली.
दुपारी उशिरापर्यंत मृतदेह उत्तरणीय तपासणी करून पंचनामा करण्याची कारवाई सुरू होती.दरम्यान, चैतन्य माळी व दत्ता माळी हे दोघे सख्ये भाऊ असून ते चैतन्य बर्डे यांच्यासह आज सकाळी शेततळ्याच्या परिसरात खेळण्यासाठी गेले होते. खेळत असताना ते पाण्यात उतरले. मात्र, पोहता येत नसल्याने ते बुडले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली.