Mohan Bhagwat : आपुलकीची भावना वाढल्यास जगात संघर्ष उरणार नाही; मोहन भागवत यांनी व्यक्त केले मत
वैश्विक चेतना मानवतेला एकत्र जोडते. जर लोकांनी हा सामायिक दुवा ओळखला आणि त्यानुसार आपले वर्तन ठेवले, तर जगात अडथळे आणि संकटे उरणार नाहीत, अस प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मंगळवारी केले.

Mohan Bhagwat : वैश्विक चेतना मानवतेला एकत्र जोडते. जर लोकांनी हा सामायिक दुवा ओळखला आणि त्यानुसार आपले वर्तन ठेवले, तर जगात अडथळे आणि संकटे उरणार नाहीत, अस प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मंगळवारी केले.
भागवत (Mohan Bhagwat) यांनी नागपूरमधील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात पूजा केली आणि मंदिराच्या गर्भगृहाचे उद्घाटन केले. मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात बोलताना संघसघंचालक म्हणाले, वैश्विक चेतना सर्वत्र व्यापलेली आहे. भगवान गणेश हे ऊर्जेचे स्रोत आहेत आणि ते संघटनेचा खरा अर्थ दर्शवतात. प्रत्येकाला या आपुलकीच्या भावनेची सूक्ष्म जाणीव असते आणि आपण एकमेकांशी जोडलेले आहोत असे वाटते.
खरी एकता काय आहे? आपण सर्वजण एकाच ऊर्जेची रूपे आहोत. जर ही वैश्विक चेतना समजून घेतली, तर स्वतःशी, इतरांशी आणि जगाशी वागण्याची व्यक्तीची पद्धत बदलते. सामान्य भाषेत आपण या भावनेला आपुलकीची भावना म्हणतो. जर ही भावना जाणीवपूर्वक दृढ केली आणि त्यानुसार वर्तन ठेवले, तर आपल्या जगातील अडथळे नाहीसे होतील.
आज जगात आपल्याला जे अडथळे आणि संकटे दिसतात, ती आपुलकीची भावना विसरल्यामुळेच आहेत. आणि त्यावर एकच खरा उपाय आहे, आपले वैयक्तिक, सामूहिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वर्तन त्या आपुलकीच्या भावनेवर आधारित असावे. तेव्हा अडथळे नाहीसे होतील, असे भागवत (Mohan Bhagwat) यांनी नमूद केले.






