Mohammad Yousuf Blames : “भारतावरचा तो एक विजयच आमचा काळ ठरला!”; पाकिस्तानच्या विनाशावर दिग्गज मोहम्मद युसूफचा खळबळजनक दावा
Mohammad Yousuf Blames : माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने पाकिस्तान क्रिकेट रसातळा जाण्याचे कारण स्पष्टपणे सांगितले.

Mohammad Yousuf Blames 2021 Win Against India For Pakistan Cricket Downfall PCB Sacks Players : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील लाजिरवाण्या घसरणीवरून देशांतर्गत संतापाचा भडका उडाला आहे. माजी महान फलंदाज मोहम्मद युसूफने (Mohammad Yousuf) पाकिस्तान क्रिकेटच्या विनाशाचे खापर २०२१ च्या टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध मिळालेल्या १० गडी राखून ऐतिहासिक विजयावर फोडले आहे. समा टीव्हीवरील चर्चेदरम्यान युसूफने संताप व्यक्त करत म्हटले की, “भारताला हरवल्यानंतर खेळाडूंची कॉलर उंचावली, प्रत्येकाच्या अंगात गर्व भिनला आणि तिथूनच पाकिस्तान क्रिकेटच्या अधोगतीची सुरुवात झाली.”
“कॉलर उंचावली अन् सुरू झाली गुंडगिरी”; संघात प्रत्येक जण कॅप्टन बनत होता!
मोहम्मद युसूफच्या मते, भारतावर विजय मिळवताच खेळाडूंना आपण जग जिंकल्याचा भास झाला आणि पुढे काय करायचे हेच त्यांना कळेनासे झाले. तो म्हणाला, “यश मिळाले की नम्र राहायचे असते; पण आमचे खेळाडू मुजोर बनले. ड्रेसिंग रूममध्ये एकी उरली नाही आणि प्रत्येक खेळाडू स्वतःला कर्णधार समजू लागला.” या अहंकारामुळेच २०२२ चा टी-२० विश्वचषक आणि आशिया चषकाचा अंतिम सामना गाठल्यानंतर पाकिस्तानचा खेळ रसातळाला गेला आणि एकाही खेळाडूने मैदानावर जबाबदारी घेतली नाही.
जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानावर नामुष्की; बोर्डाच्या कठोर कारवाईचे समर्थन!
Mohammad Yousuf finally admits the obvious: 😭💀
That 152-0 win over India in 2021 was the worst thing that happened to Pakistan cricket. The team celebrated one solitary league match win like they had conquered the sport forever, completely lost the plot, and went into a… pic.twitter.com/SY7SYzYsT7— Gaurav (@k_gauravs) September 7, 2026
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत पाकिस्तान थेट ९ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. यावर युसूफने बोचरी टीका करत म्हटले, “आम्ही नवव्या क्रमांकावर आहोत कारण स्पर्धेत एकूण ९ संघच आहेत; नाहीतर आम्ही अजून खाली गेलो असतो!” इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही कसोटीत दारुण पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तानने मालिका गमावली. त्यामुळे एका कसोटीआधीच पीसीबीने घेतलेल्या कठोर भूमिकेचे युसूफने पूर्ण समर्थन केले.
७ खेळाडूंची मायदेशी हकालपट्टी; प्रशिक्षक सर्फराझ व उमर गुलचा पत्ता कट-
🚨 MOHAMMAD YOUSUF BLAMES PLAYERS.🚨(Pak Passion)
He said – “The players are responsible, there is no doubt about it.”
Mohammad Yousuf says the PCB has given the players everything they need now the results are entirely on the players. 😳#Pakistan | #Cricket…
— Rana Ahmad. (@AhmadRana056) September 6, 2026
इंग्लंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पीसीबीने अखेरचा कसोटी सामना बाकी असतानाच मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक आणि सलमान अली आघा यांच्यासह ७ प्रमुख खेळाडूंना थेट मायदेशी हाकलून लावले. त्यांच्या जागी ७ नव्या चेहऱ्यांना संघात स्थान दिले आहे. याशिवाय मुख्य प्रशिक्षक सर्फराझ खान आणि सहाय्यक प्रशिक्षक उमर गुल यांचीही हकालपट्टी करण्यात आली असून, टी-२० चे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांच्याकडे कसोटी संघाची अंतरिम धुरा सोपवण्यात आली आहे.





