MLA Manoj Ghorpade : शेतकर्यांना समृद्ध करणे हीच सरकारची भूमिका; आ. घोरपडेंनी मांडली विकासाची नवी दिशा
MLA Manoj Ghorpade : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवड्यानिमित्त निसराळे येथे शेतकरी मेळावा; सिंचन योजना पूर्ण करण्याबाबत आ. मनोज घोरपडे यांचे आश्वासन.

MLA Manoj Ghorpade – शेतकर्यांना समृद्ध करणे, हीच महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे, असे आमदार मनोज घोरपडे यांनी सांगितले. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरावड्यांतर्गत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार, विद्यापीठ केव्हीआर सेवाभावी संस्थेच्यावतीने उरमोडी धरणांतर्गत शेतकर्यांसाठी निसराळे, ता. सातारा येथील अथर्वराज मंगल कार्यालयात झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.
जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, सातारा पंचायत समितीच्या उपसभापती सुषमाताई जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र चव्हाण, भूषण यादगीरवार, रवींद्र माने, अमर काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार मनोज घोरपडे म्हणाले, प्रत्येक शेतकर्याच्या शेतीला पाणी देण्याची सरकारची आणि माझी भूमिका आहे; परंतु उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी शेतकर्यांची आहे.
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सर्व ठिकाणी पाणी उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. उर्वरित योजनाही लवकरच पूर्ण होतील. या सेवा पंधरवड्यामध्ये संपूर्ण राज्यातील शेतकर्यांना जलव्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतीमध्ये एआय तंत्रज्ञान वापरून, जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य समृद्धी जाधव, सुधीर जाधव, संजय पाटील, जालिंदर आवळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहनराव जाधव, भरत माने, अमोल माळी, मधुकर यादव, परिसरातील शेतकरी उपस्थित होते.





