Devendra Fadnavis : मिलिंद नार्वेकरांचा फोन आला अन्….; CM फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, काय घडलं होतं?

Devendra Fadnavis : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. पण पुन्हा एकदा या निवडणुका पुढे ढकण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ च्या आतमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. खरंतर गेल्या काही दिवासांपूर्वी काही महापालिकेतील प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या होत्या. यामुळे लवकरच निवडणुका होतील अशी आशा वाटत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत.
असे असले तरी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपकडून मुंबईसह राज्यभरात जोरदार मोर्चेबांधनीची आखणी करण्यात येत आहे. मुंबईत देखील भाजपने कंबर कसली असून भारतीय जनता पक्षाचा संकल्प मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर बसायची वेळ त्यावेळी आली होती. पण मला आजही आठवतं की, मला फोन आला. एकनाथ शिंदे जे आपले सहकारी आहेत आणि मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
आपण क्षणाचाही विलंब लावला नाही.
फोनवरून नार्वेकरांनी उद्धवजी नर्व्हस झाले आहेत, नाराज झाले आहेत. त्यामुळे आमची विनंती आहे की शिवसेनेला महापौर द्या असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर फडणवीस म्हणाले, आपण क्षणाचाही विलंब लावला नाही. माझ्या सर्व सहकाऱ्यांना बोलावलं, त्यांना विचारलं की, काय करायला पाहिजे.
राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
सगळ्यांनी सांगितलं की, ठिक आहे, तुम्हाला वाटत असेल तर आपण एक पाऊल मागे घेऊ आणि पुन्हा एकदा महापौर पद देऊ, त्यामुळे आपल्या हाती असलेला महापौर आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देऊन टाकला, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
हेही वाचा : Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव





