Aamir Khan Love Story: २५ वर्षांनंतर पुन्हा झाली भेट, मैत्रीचं प्रेमात रूपांतर; आता आमिर खान तिसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात
Aamir Khan Love Story आमिर आणि गौरी यांनी बराच काळ आपले नाते सार्वजनिक केले नव्हते. मार्च २०२५ मध्ये आमिरने त्याच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त प्रथमच गौरीची अधिकृतपणे सर्वांना ओळख करून दिली. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली.

Aamir Khan Love Story: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आमिर ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅटसोबत नोंदणीकृत विवाह (रजिस्टर मॅरेज) करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांची प्रेमकहाणीही चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांना आमिर आणि गौरी यांची पहिली भेट कशी झाली आणि त्यांचे नाते कसे फुलले, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. (Aamir Khan Love Story)
मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांची पहिली भेट अनेक वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये झाली होती. त्या भेटीनंतर दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले आणि त्यांचा संपर्क तुटला. मात्र तब्बल २५ वर्षांनंतर त्यांची पुन्हा भेट झाली. या भेटीनंतर दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. (Aamir Khan Love Story)
आमिर आणि गौरी यांनी बराच काळ आपले नाते सार्वजनिक केले नव्हते. मार्च २०२५ मध्ये आमिरने त्याच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त प्रथमच गौरीची अधिकृतपणे सर्वांना ओळख करून दिली. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली. (Aamir Khan Love Story)
गौरी स्प्रॅट या बंगळुरूच्या रहिवासी असून त्या फॅशन आणि फोटोग्राफी क्षेत्राशी संबंधित आहेत. सध्या त्या आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसबरोबरही काम करत असल्याचे सांगितले जाते. व्यावसायिक नात्याबरोबरच दोघांमधील मैत्री अधिक घट्ट होत गेली आणि अखेर त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. (Aamir Khan Love Story)

Aamir Khan Love Story: २५ वर्षांनंतर पुन्हा झाली भेट, मैत्रीचं प्रेमात रूपांतर; आता आमिर खान तिसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात
आमिर खानने अनेक मुलाखतींमध्ये गौरीबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. त्याच्या मते, गौरी आयुष्यात आल्यानंतर त्याला मानसिक शांतता आणि स्थैर्य मिळाले. तिच्यासोबत असताना वेगळाच आनंद आणि आपलेपणाची भावना अनुभवायला मिळते, असे त्याने सांगितले आहे. इतकेच नव्हे, तर “आता जाऊन मी पूर्ण झाल्यासारखे वाटते,” असेही आमिरने एका मुलाखतीत म्हटले होते. (Aamir Khan Love Story)
माध्यमांतील वृत्तांनुसार, ५ जुलै रोजी मुंबईतील आमिरच्या निवासस्थानी कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडणार आहे. हा विवाह विशेष विवाह कायद्यांतर्गत (Special Marriage Act) नोंदणीकृत पद्धतीने होणार असल्याचेही सांगितले जात आहे. या खास प्रसंगी चाहत्यांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही आमिरने केले आहे. (Aamir Khan Love Story)
ही आमिर खानची तिसरी विवाहबंधनातील एन्ट्री असेल. यापूर्वी त्याने रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला जुनैद खान आणि आयरा खान ही दोन मुले आहेत. त्यानंतर आमिरने किरण राव यांच्याशी विवाह केला. मात्र २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांना आझाद राव खान हा मुलगा आहे. (Aamir Khan Love Story)
विशेष म्हणजे, दोन्ही विवाह संपल्यानंतरही आमिरचे त्याच्या दोन्ही माजी पत्नींसोबत मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत. आता गौरी स्प्रॅटसोबत तो आयुष्याच्या नव्या टप्प्याची सुरुवात करण्याच्या तयारीत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. (Aamir Khan Love Story)





