Manoj Jarange : पाणी, सलाईनही आजपासून बंद; मृत्यू स्वीकारेन, पण माघार घेणार नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि प्रशासनाविरोधात आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलीस स्टेशनने परवानगी दिलेली नाही. परवानगी अर्ज काल दुपारी पोलिसांकडे देण्यात आला होता. दरम्यान, सरकारला पुनर्विचार करून परवानगी द्यावीच लागेल. आतापासून सलाईन आणि पाणी देखील बंद करत आहे. १९ तारखेला आंदोलन होणारच, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. (Manoj Jarange)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे काढण्यात येणाऱ्या प्रस्तावित शांततापूर्ण मोर्चादरम्यान आपल्याला जीवे मारण्याचा आणि गोंधळ निर्माण करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. आपण कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. (Manoj Jarange)
रविवारी त्यांच्या उपोषणाचा १६ वा दिवस होता. यावेळी अंतरवाली सराटीत आंदोलनस्थळी समर्थकांशी आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. जरांगे म्हणाले, सत्ताधारी पक्षांशी संबंधित लोक गोंधळ आणि आपल्याला लक्ष्य करण्यासाठी या मोर्चात पाठवले जाऊ शकते. (Manoj Jarange)
मी मृत्यू स्वीकारेन, पण माघार घेणार नाही. तसेच, मुंबईतील प्रस्तावित आंदोलनापूर्वी हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडे अजूनही आठ दिवसांचा कालावधी असल्याचे त्यांनी नमूद केले. (Manoj Jarange)
जेव्हा कोणी सापाच्या शेपटीवर पाय देते, तेव्हा त्याला प्रत्युत्तर द्यावेच लागते, असे सांगत जरांगे यांनी इशारा दिला की, त्यांचे समर्थक काही मंत्र्यांना राजकीय आव्हान देऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत, सत्तेत असलेल्यांनी आपल्या विरोधात कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. (Manoj Jarange)
मी १९ सप्टेंबरला मुंबईत पोहोचून सकाळी १० वाजता आझाद मैदानावर उपोषणाला बसेन. आमचा कायदा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आंदोलनाच्या परवानगीसाठी अर्ज सादर करण्यात आला आहे आणि सरकार या आंदोलनावर काही अटी-शर्ती लादू शकते, असे जरांगे म्हणाले. (Manoj Jarange)





