Sahil Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्र फिरणार कारण….
Sahil Goyal : सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ केली असून, 3 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Sahil Goyal : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना काल वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आलं. २९ जून रोजी त्यांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने प्रकरणात विविध पैलूंचा तपास पोलिसांना करायचा असल्याने आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ करण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ केली असून, 3 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्याअगोदर पोलिसांनी दोन्ही आरोपींना लोहगडागवर ज्या ठिकाणी गुन्हा घडला. त्या स्पॅाटवर नेण्यात आले होते. यासाठी एक डमी पुतळा तयार करून त्याला त्या ठिकाणहून दरीत ढकलण्यात आले. हा भाग म्हणजे गुन्ह्याचा प्रतिकात्मक भाग होता. यामधून नेमकं कशा प्रकारे घटना घडली असावी, याची शहानिशा करण्यासाठीचा हा प्रयोग होता. सध्या पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून, सिया गोयलचा भाऊ साहिल गोयलकडे याच्याकडे तपासाची चक्रे पुन्हा फिरणावर असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : PMRDA News: पीएमआरडीएचा अजब कारभार! मोजणी न करताच शेतकऱ्यांच्या जमिनींवर ठोकला ताबा?
लव्हस्टोरीबाबत साहिलला पूर्वकल्पना होती?
पोलिसांनी साहिल गोयल याची चौकशी केल्यानंतर त्याच्या चौकशीतून सिया आणि चेतन यांची पहिली भेट कधी झाली याविषयी पोलिसांना माहिती मिळाली. क्रिकेट खेळताना आधी चेतन आणि साहिलची मैत्री झाली. ही कबुली साहिलने स्वतः दिली. पुढं साहिलसोबत सिया मॅच बघायला गेली अन तिथून चेतन तिचा मित्र बनला. पुढं या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यामुळे सिया-चेतनच्या लव्ह स्टोरीबाबत साहिलला पूर्वकल्पना होती का? असा मुख्य सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच सियाला केतनसोबत लग्न करायचं नव्हतं हे तिने पोलिस चौकशीत सांगितलं आहे.
सिया आणि साहिलमध्ये भांडण?
सिया आणि केतन यांना बालीला प्री विडिंग शूटला जायचं होतं. पण काही कारणामुळे बाली ट्रिप रद्द झाली. याचा एक भाग म्हणजे प्री विडिंग शूटला जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्यावर सिया आणि साहिलमध्ये भांडणही झालं होतं का असा सवालही उपस्थित केला जात आहे. असे अनेक सवाल उपस्थित केले जात असून प्रकरणात पुढे नेमक्या कोणत्या धक्कादायक बाबी समोर येतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : TET Paper Leak: शालेय शिक्षणमंत्र्यानी राजीनामा द्यावा! टीईटी पेपर फुटीप्रकरणी एसएफआय आणि मनविसे रस्त्यावर






