Maharashtra Politics : काँग्रेसला मोठं खिंडार, शरद पवार गटाला धक्का! महायुतीने डाव साधला, नेमकं काय घडतयं?
Maharashtra Politics : नागपूर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अतुल लोंढे तर महायुतीकडून भाजपचे राजीव पोतदार रिंगणात आहेत.

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतांची जुळवाजुळव आणि नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. या प्रयत्नला महायुतीला मोठं यश मिळताना दिसत आहे.
अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक ठिकाणी मोठे धक्के बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गोंदिया, बुलढाणा आणि हिंगोलीतील राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली असून महायुतीचे संख्याबळ मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.
काँग्रेसला मोठा धक्का (Maharashtra Politics)
गोंदिया-भंडारा विधान परिषद मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवरी तालुक्यातील काँग्रेसचा एक जिल्हा परिषद सदस्य आणि दोन नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही भाजपच्या काही नगरसेवकांसह सहलीवर गेल्याची चर्चा असून त्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठं खिंडार, शरद पवार गटाला धक्का! महायुतीने डाव साधला, नेमकं काय घडतयं?
शरद पवार गटाचे चार नगरसेवक नॅाट रिचेबल (Maharashtra Politics)
दुसरीकडे, हिंगणा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सहा नगरसेवक अचानक संपर्काबाहेर गेल्याने महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. नागपूर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अतुल लोंढे तर महायुतीकडून भाजपचे राजीव पोतदार रिंगणात आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा : Mint Storage: पुदिना काळा पडतोय? या ५ टिप्स ठरतील फायदेशीर
ठाकरेसेनेचे वर्चस्व वाढले
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्येही मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसच्या 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे नगरपालिकेतील संख्याबळ 7 वरून थेट 16 वर पोहोचले आहे.
पत्रकार परिषद घेत काँग्रेस नगरसेवकांनी आपल्या भूमिकेची घोषणा केली. नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, ठाकरे गट आणि शिंदे गट स्वतंत्र लढले होते. मात्र आता विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसमधील नऊ नगरसेवकांनी ठाकरे गटाला पाठिंबा दिल्याने मेहकरमध्ये ठाकरे सेनेचे वर्चस्व वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांचे मेहकर हे होम टाऊन मानले जाते. त्यामुळे या राजकीय घडामोडींना राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा : Amin Haji : लगानने माझं करिअर उद्ध्वस्त केलं; 25 वर्षानंतर ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा





