Mahua Moitra: ‘जेव्हा मी रात्रभर रडले, तेंव्हा शुभेंदू अधिकारी…’ ; महुआ मोइत्रा यांचे धक्कादायक वक्तव्य, ममतांची साथ सोडणार?
Mahua Moitra:

Mahua Moitra: पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. टीएमसीच्या आमदारांनी एक वेगळा गट स्थापन केला असून, ऋतब्रता बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली आहे. इतकेच नाही, तर काकोली घोष यांच्या नेतृत्वाखाली २० खासदारही फुटले आहेत.
ममता बॅनर्जी आपला पक्ष टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत. दरम्यान, त्यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या कृष्णनगरच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी एक धक्कादायक विधान केले आहे.
महुआ मोईत्रा आणि सुवेंदू अधिकारी सध्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सुवेंदू अधिकारी यांची प्रशंसा केली. महुआ यांनी बंगालच्या मुख्यमंत्र्यांना आपला चांगला मित्र म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, जेव्हा त्या कठीण काळातून जात होत्या, तेव्हा सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना मदत केली होती.
सुवेंदू अधिकारी माझे चांगले मित्र Mahua Moitra:
महुआ म्हणाल्या, “सुवेंदू माझे चांगले मित्र आहेत. आम्ही एकाच पक्षात असताना त्यांनी मला खूप पाठिंबा दिला. जेव्हा मी करीमपूरमधून निवडणूक लढवली, तेव्हा फक्त तेच माझ्या प्रचारासाठी आले होते.” मला जी काही मदत लागली, ती त्यांनी दिली.
सुवेंदू अधिकारी यांनी मला पाठिंबा दिला
महुआ मोईत्रा यांनी आठवण करून दिली की, २०१४ मध्ये जेव्हा त्यांना लोकसभेचे तिकीट मिळणार होते, पण काही कारणास्तव ते मिळू शकले नाही. त्या रात्रभर रडल्या आणि फक्त सुवेंदू अधिकारी यांनीच त्यांना आधार दिला. टीएमसीच्या खासदार म्हणाल्या, “सुवेंदू मला म्हणाले, ‘नाही ताई, मी इथेच आहे.’ ही सर्व भावनिक नाती आहेत. आज आम्ही वेगवेगळ्या पक्षात आहोत. आम्ही बोलत नाही, ती वेगळी गोष्ट आहे.”
ममता बॅनर्जी यांच्या जवळचे असलेले सुवेंदू अधिकारी हे टीएमसीच्या सर्वात प्रमुख नेत्यांपैकी एक होते. २०२१ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०२६ मध्ये भाजपच्या प्रचंड विजयानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले.
महुआ यांनी २०१६ मध्ये पहिली निवडणूक लढवली Mahua Moitra:
महुआ यांनी २०१६ मध्ये करीमपूर मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी सुवेंदू अधिकारी हे नादिया जिल्ह्यासाठी टीएमसीचे पर्यवेक्षक होते. २०१९ मध्ये, त्यांना कृष्णनगर मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट मिळाले आणि त्या खासदार म्हणून दिल्लीत परतल्या. त्यानंतर त्यांनी २०२४ मध्ये कृष्णनगरची जागा जिंकली.






