Raj Thackeray : आदेश देणारे लोक कधी माफी मागणार? राज ठाकरेंचा PM मोदींना थेट सवाल
याची सुरुवात भाजपच्या ट्रोल आर्मीपासून झाली. तीच गोष्ट आता तुमच्या अंगलट आली आहे. मला पंतप्रधानांना हे सांगायचे आहे की इतरांनाही आया असतात. तुमच्या पक्षातील लोकांना मर्यादा पाळायला सांगा.

Raj Thackeray | PM Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की त्यांनी त्या तरुणांना माफ केले आहे, पण गेल्या १२ वर्षांत तुमच्या लोकांनी जे काही केले आहे, त्याबद्दल कोण माफी मागणार? जंतर-मंतरवर लोकांची डोकी फोडली गेली होती. त्याचे आदेश देणारे लोक कधी माफी मागणार?, असा सवाल करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशणा साधला.
दिल्लीतील जेन झी म्हणजेच आजच्या तरुण पिढीने पुकारलेल्या आंदोलनांवर राज ठाकरे यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका अलीकडील व्हिडिओचा संदर्भ दिला.
राज ठाकरे म्हणाले, मी पंतप्रधानांचा नवीन व्हिडिओ पाहिला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आंदोलकांकडून वापरली गेलेली भाषा आणि व्हिडिओ अयोग्य होते. मी या मताशी सहमत आहे. कोणाविरुद्धही अशी अपमानास्पद भाषा वापरली जाऊ नये.
मात्र, मी पंतप्रधानांना हेही सांगेन की त्यांनी आपल्या पक्षातील लोकांवरही लक्ष द्यावे. महात्मा गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळापासून ते आजपर्यंत, तुमच्या बाजूचे लोक म्हणजेच ट्रोल प्रत्येक राज्यात कार्यरत आहेत. ते जी भाषा वापरतात, त्याकडे जरा पहा. पंतप्रधानांनी त्यांनाही हे थांबवण्यास सांगितले पाहिजे.
हा प्रकार गेल्या १२ वर्षांत सुरू झाला. याची सुरुवात भाजपच्या ट्रोल आर्मीपासून झाली. तीच गोष्ट आता तुमच्या अंगलट आली आहे. मला पंतप्रधानांना हे सांगायचे आहे की इतरांनाही आया असतात. तुमच्या पक्षातील लोकांना मर्यादा पाळायला सांगा.
मला याच्या मूळ कारणाबद्दल प्रश्न पडतो. नीट परीक्षा हे नक्कीच एक कारण आहे. पण सर्वत्र मिळालेला प्रतिसाद पहा, केवळ विद्यार्थीच नव्हते, तर तरुण-तरुणीही त्यात होते.
ते रस्त्यावर का उतरले? याचे कारण आजूबाजूच्या वातावरणात दडलेले आहे. नीट पेपरफुटी ही केवळ एक ठिणगी होती, पण जो तीव्र संताप उसळला, तो साचलेल्या तक्रारींमधून निर्माण झाला आहे.





