Maharashtra Monsoon Session 2026: आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; विरोधकांची रणनीती काय असणार?
Maharashtra Monsoon Session 2026: विधान परिषदेच्या उपसभापतींची निवड होण्याची शक्यता

Maharashtra Monsoon Session 2026: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात कंत्राटातील कमिशन, शेतकरी कर्जमाफी, राज्यातील संभाव्य दुष्काळ या विषयांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सामना होऊ शकतो.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या घोषणेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती’ योजना जाहीर केली आहे. मात्र, या योजनेतील अटी-शर्ती जाचक असल्याची टीका होत असल्याने विरोधकांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने राज्यावर पाणीटंचाई आणि दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून लावून धरली जाणार आहे. Maharashtra Monsoon Session 2026
गेल्या महिन्यात पिंपरी- चिंचवड परिसरात हातभट्टीची विषारी दारू प्यायल्याने २२ जण दगावले. या घटनेने राज्यात राजरोस सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारूचा प्रश्न समोर आला आहे. या दुर्घटनेवरून विरोधी पक्षाकडून गृह आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याला लक्ष केले जाऊ शकते. राज्यातील कोचिंग क्लासच्या नियमनासाठी गेली दोन दशके चर्चेत असलेल्या स्वतंत्र कायद्याला यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या उपसभापतींची निवड होण्याची शक्यता-
माजी उपसभापती डॉ. नीलम गोहे यांची विधान परिषदेची मुदत गेल्या महिन्यात संपल्याने उपसभापती पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे या अधिवेशनात विधान परिषदेच्या नव्या उपसभापतींची निवड अपेक्षित आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक निकालाची अधिसूचना जारी झाल्यानंतर नव्या उपसभापती निवडीची प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच डॉ. गोहे विधान परिषदेवर पुन्हा निवडून आल्याने उपसभापती पदावर त्यांची वर्णी लावली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
विरोधकांकडून सरकारच्या चहापानावर बहिष्कार
दुसरीकडे, काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत सरकारवर निशाणा साधला. तर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी कंत्राटामध्ये ५६ टक्के कमिशन, शेतकरी कर्जमाफी याबाबत भाष्य केले.
तर ऑपरेशन टायगरवरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही अर्धवट ऑपरेशन करत नाही, पूर्ण करतो. याचा अनुभव तुम्हाला आहे. थोडे थांबा लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले. Maharashtra Monsoon Session 2026
हेही वाचा:






