Devendra Fadnavis : राज्यातील अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या नुकसानीपोटी तब्बल 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. (Devendra Fadnavis) मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, या कालावधीत सुमारे 1 लाख 14 हजार 752 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे राज्यातील 1 लाख 80 हजार 574 शेतकरी बाधित झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून 128.86 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना बसला होता. जानेवारी ते मार्च 2026 नुकसान दरम्यान, जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीतही अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. या काळात 1 लाख 45 हजार 606 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले असून 2 लाख 33 हजार 890 शेतकरी बाधित झाले आहेत. केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे. या टप्प्यात लातूर, सोलापूर, सातारा, नंदूरबार, यवतमाळ, पुणे, जालना, बुलढाणा आणि बीड या जिल्ह्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या आपत्तीमध्ये 5 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी आणि 36 जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. (Devendra Fadnavis) एप्रिल 2026 मध्येही फटका एप्रिल महिन्यातील पावसामुळेही 1 लाख 94 हजार 329 शेतकऱ्यांच्या 1 लाख 22 हजार 993 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जानेवारीपासून झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून लवकरच पुढील मदतीचा निर्णय अपेक्षित आहे. सिंचन प्रकल्पांनाही गती याच बैठकीत जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2022 पासून आतापर्यंत 41 प्रकल्प पूर्ण झाले असून सुमारे 105 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. यामुळे 2.95 लाख हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता तयार झाली आहे. तसेच, 225 प्रकल्पांना सुधारित आणि प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यात 33.45 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या सर्व निर्णयांमुळे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Devendra Fadnavis)