“मातृभूमीसाठी आयुष्य…”; राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

Kargil Vijay Diwas | कारगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. देशात यंदा 26 वा कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. 1999 मध्ये भारतीय सैन्याने कारगिल युद्ध जिंकले होते. याच निमित्त अन्य राजकीय नेत्यांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि म्हणाले, “देशवासीयांना कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा प्रसंग आम्हाला माँ भारतीच्या त्या वीर सुपुत्रांचे अप्रतिम शौर्य आणि पराक्रमाची आठवण करून देतो, ज्यांनी देशाच्या आत्मसन्मानाच्या रक्षेसाठी आपले जीवन समर्पित केले. मातृभूमीसाठी आयुष्य वाहण्याचे त्यांचे सामर्थ्य प्रत्येक पिढीला प्रेरित करत राहिल.” Kargil Vijay Diwas |
राष्ट्रपतींनी अर्पण केली श्रद्धांजली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले की, ‘कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने मी मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करते. हा दिवस आपल्या जवानांच्या असाधारण शौर्य, साहस आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. देशाप्रती त्यांचे समर्पण आणि सर्वोच्च बलिदान देशवासियांना नेहमी प्रेरणा देत राहील. जय हिंद! जय भारत!’ Kargil Vijay Diwas |
कारगिल विजय दिवस के अवसर पर मैं मातृभूमि के लिए प्राण न्योछावर करने वाले वीर सैनिकों को श्रद्धांजलि अर्पित करती हूं। यह दिवस हमारे जवानों की असाधारण वीरता, साहस एवं दृढ़ संकल्प का प्रतीक है। देश के प्रति उनका समर्पण और सर्वोच्च बलिदान देशवासियों को सदैव प्रेरित करता रहेगा।
जय…— President of India (@rashtrapatibhvn) July 26, 2025
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह –
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्सवर लिहिले की, ‘कारगिल विजय दिनानिमित्त मी त्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही देशाच्या सन्मानाच्या रक्षणात असाधारण साहस, संयम आणि दृढनिश्चय दाखवला. कारगिल युद्धादरम्यान त्यांच्या सर्वोच्च बलिदानाने आपल्या सशस्त्र दलांच्या अटळ संकल्पाची चिरस्थायी आठवण करून दिली. भारत त्यांच्या सेवेसाठी नेहमी ऋणी राहील.’ Kargil Vijay Diwas |
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह –
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर लिहिले की, ‘कारगिल विजय दिवस हा देशाच्या वीर जवानांच्या गौरव आणि विजयगाथेचा अविस्मरणीय दिवस आहे. 1999 मध्ये आपल्या जवानांनी ‘ऑपरेशन विजय’च्या माध्यमातून शत्रूंना गुडघ्यावर आणून साहस आणि पराक्रमाची अमिट मिसाल प्रस्थापित केली. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने त्या सर्व शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. हे राष्ट्र तुमच्या त्याग आणि बलिदानाचे नेहमी ऋणी राहील.’ Kargil Vijay Diwas |
हेही वाचा :
Satej Patil : बिलासाठी संघर्ष करत करत हर्षल गेला; सतेज पाटलांनी दिला कुटुंबीयांना धीर





