पाणी आपल्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आणि उपयोगी आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हटले आहे. पाणी पिण्याच्या आपल्या आपल्या सवयी आठवा. शक्य असल्यास त्या सवयी बदला. त्याचा तुमचे आरोग्य सुधारणेस फायदाच होईल. वरीलप्रमाणे पाणी पिल्यास आरोग्यमय जीवन जगता येईल.
पाणी म्हणजे जीवन. जगण्यासाठी पाणी अत्यंत अवश्यक आहे. आपल्या शरीरात 2/3 पाणी असतेच. पाण्याचं प्रमाण शरीरात योग्य असावं लागतं. अन्यथा आपणास शारीरीक त्रास सुरु होतो. त्यामुळं पाणी प्यावे लागते. डायरिया झालेल्या रोग्याच्या अंगातील पाणी कमी झाल्यामुळे त्यास सलाईन लावावी लागते. किंवा मीठ साखर पाणी प्यावे लागते. पाण्यामुळे शरीराला नको असलेले घटक मुत्र आणि घामावाटे बाहेर टाकले जातात. मग आपल्याला तहान लागते आणि मग आपण पाणी पितो.
पृथ्वीवरही 3/4 पाणी आहे. पण पिण्यायोग्य पाणी खूप कमी आहे. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे पाणी खराब होत आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी कमी कमी होत आहे. तिसर महायुध्द पिण्याच्या पाण्यावरुनच होईल असं जाणकार सांगत असतात. त्यामुळे पाणी जपलं पाहिजे.
दुषित पाणी पिण्यात आल्यास मुतखड्यासारखे आजार होतात. अनेकदा तर पाणी भरुन ठेवलेल्या भांड्यावर पाण्यात असलेले क्षार साठलेले दिसतात. काही काही वेळा तर पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांमध्येही असे क्षार जमा होऊन कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होतो.
असे असले तरीही पाणी पिणे गरजेचे आहे. त्यासाठी पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवावी, म्हणजे बरेच क्षार तळाला जमा होतात. वरचे पाणी पिण्या योग्य होते. तसेच पाणी उकळून गार केलेले पाणी पिण्यास योग्य असते. गोड्यापाण्याचे स्रोत कमी होत आहेत. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी कमी कमी होत आहे. म्हणून प्रक्रिया केलेले पाणी आज बाजारात विक्रीला ठेवले जात आहे. अशा प्रक्रिया केलेल्या पाण्यातही प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक पदार्थ सापडले आहेत. म्हणजे पाणी पिण्यायोग्य करण्याच्या नादात त्यामध्ये रासायनिक पदार्थाचा वापर होतो, जी रसायनं आपल्या शरीराला घातक आहेत.
काही वेळा पावसाचे पाणी छतावरुन एका टाकीत जमा केले जाते. त्याचाच वापर वर्षभर पिण्यासाठी करता येतो. पहिला पाऊस पडून गेल्यावर छत साफ होते. मग दुसऱ्या पावसापासूनचे पाणी टाकीत जमा केले जाते. ते पाणी वर्षभर फक्त पिण्यासाठी मग वापरले जाते. कारण पावसाचे पाणी आकाशातून पडत असल्याने त्यामध्ये काही घाण, किंवा इतर पदार्थ मिसळत नाहीत. त्यामुळे पाणी वर्षभर खराबही होत नाही व पिण्या योग्य राहते.
आपणासही तसे करता येईल. म्हणजे मग वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. डोंगरावर असलेल्या जलसाठ्याचे पाणीही खूप चांगले असते. एकूणच पाणी आपल्यासाठीच नव्हे तर पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी खूप गरजेचे आहे.
पाणी कोणते प्यावे? पाणी नेहमी स्वच्छ आणि शुध्द प्यावे. अती थंड पाणी पिणे सर्वथा टाळावे. किंवा कढत कढत पाणी पिऊ नये. बाहेरील हवामानाशी मिळते जुळते पाणी प्यावे.
पाणी कसे प्यावे?
1. पाणी घटघट पिऊ नये. पाणी घोट घोट प्यावे. जसेकी चिमणी पाणी पिते.
2. पाणी उभ्याने पिऊ नये. पाणी बसून प्यावे. नाहीतर गुडगे दुखीचा त्रास संभवतो.
3. पाणी वरुन पिऊ नये. पाणी पात्राला तोंड लावून प्यावे. त्यामुळे दंत आरोग्य सुधारते.
4. अती थंड किंवा अती गरम पाणी पिऊ नये. त्यामुळे अपचनाचे त्रास संभवतात,
5. पाणी गरम करुन उकळावे. नंतर थंड झाल्यावर प्यावे. त्यामुळे पाण्यातील अपायकारक जंतू मरतात.
6. जेवताना थंड पाण्याऐवजी गरम ज्यास आपण कोमट पाणी म्हणतो ते प्यावे. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
7. तांब्याच्या(कॉपर) भांड्यातील पाणी पाण्यास खूप चांगले. तांब्याच्या भांड्यातील पाणी तासात स्वच्छ व शुध्द होते. त्यातील जंतू आपोआप मरतात.
8. मातीच्या भांड्यातील पाणीही पिण्यास चांगले असते.
9. रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. ते अरोग्यास हितकारक असते. तसेच मलविसर्जन सुलभ होते. गरम पाणीही त्यासाठी योग्य आहे.
10.रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात मेथीदाणे टाकावेत. सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावे. मग मेथीदाणे चाऊन खावेत. वात विकारात फायदा होतो. गुडगेदुखी, कंबरदुखीसाठी बहूगुणी औषध आहे.
11.जेवणापूर्वी पाणी पिऊ नये. जेवणानंतर एक तासानंतर पाणी प्यावे.
12.बाटलीबंद पाणी पिण्यास योग्य नसते. त्यात किटक नाशकांचा अंश असतो.
13.फ्रिजमधील किंवा अतीथंड पाणी पिऊ नये. मलावरोधाच्या तक्रारी वाढतात.
14.दिवसाची सुरुवात आणि शेवट थंड पाणी पाण्याने करा.
15.जेवण सुरू असताना मध्येमध्ये सारखे पाणी पिऊ नये.
16.जेवताना अन्नाचा घास खाली सरकत नसेल तर पाण्याचा लहानसा घोट घ्यावा. अन् खाली सरकण्यास मदत होते. जेवण झाल्यानंतर तोंडात पाणी घेऊन खळखळून चुळा भराव्यात. त्यामुळे दात व हिरड्याना चिकटलेले अन्नकण निघण्यास मदत होते. दातांचे आरोग्य चांगले राहते.
17.तांब्याच्या भांड्यातील पाणी सलग पिऊ नये. सलग सहा महिने पाणी पिल्यानंतर तीन दिवस थांबावे. परत एक महिन्यानी असेच करावे.
18.पावसाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. उन्हाळ्यात मातीच्या भांड्यातील पाणी प्यावे.
आता तांब्याच्या भांड्याचा प्रश्न निर्माण होतो. आपण घरात होती ती तांब्या पितळेची भांडी स्वस्तात मोडीला दिली. आणि स्टील आणि प्लॅस्टिकची घेतली. आता तांब्याची घ्यायची म्हटली तर खूप महाग आहेत.
तांब्याच्या भांड्यातील पाणी कसं मिळणार. पूर्वी तांब्याची नाणी असायची. ते नाणं आपल्याकडील पाण्याच्या भांड्यात टाकावे. किंवा तांब्याच्या तारेची गुंडाळी पाण्यात टाकली तरी सर्व फायदे आपणास मिळतात.