Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीच्या पैशामुळे वाढताहेत कौटुंबिक वाद; पंधराशे रुपयामुळे पतीराजांना घेता येईना चारचाकी

प्रभात वृत्तसेवा
राहू – मागील विधान सभा निवडणुकीपासून सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजे “लाडकी बहीण”योजना. निवडणुकीपासून या ना त्या कारणाने ही योजना वादात सापडत आहे. सामान्य नागरिक असेल,विरोधक असेल या योजनेवर मोठा प्रमाणात टीका करताना दिसून येत आहे. परंतु आता ही योजना वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. या योजनेमुळे आता कौटुंबिक वाद वाढताना दिसत आहेत. हे वाद पार घटस्फोटापर्यंत गेला आहे.
त्यामध्ये सरकारने के.वाय.सी.ची अट टाकल्यामुळे अनेक लाडक्या बहिणीची झोप उडाली आहे. त्यात अनेक पती देवांना आपले उत्पन्न कोणत्याही कायदेशीर गोष्टीत गुंतवता येत नसल्यामुळे अडचणी वाढत आहेत. त्यामुळे नवरा बायकोचा वाद वाढताना दिसत आहे. के.वाय.सी. करताना नवऱ्याची देखील के.वाय.सी. करावी लागणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी पुढे येऊन लाडक्या बहिणींची अडचण वाढताना दिसत आहे. नवऱ्याचे उत्पन केवायसीमध्ये जर जास्त आढळले.
तर बायकोचे 1500 रुपये बंद होणार आहेत. त्यामुळे बायकोच्या 1500 रुपयांच्या हट्टापाई पती राजांना आपल्या हजारो रुपयांचा व्यवसाय हा पूर्ण क्षमतेने करता येत नाही. काही घटनांमध्ये तर नवऱ्याला चारचाकी गाडी घ्यायची असताना देखील बायकोच्या 1500 रुपयांसाठी चारचाकी गाडी घेऊ नये म्हणून वाद वाढताना दिसत आहेत.हे वाद पार घटस्फोटापर्यंत गेले आहेत.
अजून 2100 मिळायचे आहेत..
शासनाच्या जाहीरनाम्यानुसार ठराविक काळानंतर लाडकी अभिनयाला 2100 रुपये मिळणार आहेतजर 2100 रुपये चालू झाले. तर काय परिस्थिती होईल, याची कल्पना न केलेली बरी. यावर कडी म्हणून की काय मागे एकदा एक मंत्री महोदयांनी लाडक्या बहिणीला कर्ज देण्याची देखील घोषणा केली होती.





