Ladki Bahin Yojana: “लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 3000 रुपये मिळणार”; CM शिंदे काय म्हणाले, पाहा…..

CM Eknath Shinde | Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया 14 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.
उर्वरित पात्र महिलांनासुद्धा 17 ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकतंच पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम पडला.
यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी आणखी मोठी घोषणा केली असल्याचं पाहायला मिळालं आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “कॅबिनेटमध्ये मी सांगितलं होतं की रक्षा बंधनाच्या आधी हे पैसे पोहोचले पाहिजे. खातं चालतं की नाही हे बघायचं होतं. त्यामुळे एक रुपया टाकायचा सल्ला काहींनी दिला. पण अजितदादा फडणवीस यांनी सांगितलं तीन हजार टाका आणि ट्रायल रन घ्या. लाडक्या बहिणी सांगत असतात खात्यात पैसे आले.
तेव्हापासून राखी बांधायचा कार्यक्रम सुरू झाला. बहिणींच्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी नारी शक्ती आल्या आहेत. मी बहिणींशी संवाद साधून स्वातंत्र्य दिन साजरा केला. अनेक बहिणींनी भावना व्यक्त केल्या. आम्हाला आधार मिळाला म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्यक्त केला.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहील. उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही बळ दिलं तर दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील. दोन हजार होतील, अडीच हजार होतील, अडीच हजाराचे तीन हजार होतील.
या सरकारची ताकद वाढली तर तीन हजारापेक्षा जास्त देण्याची ताकद आली तर आम्ही हात आखडता घेणार नाही. सरकार तुमचं आहे. देण्याची नियत लागते. दानत लागते. ती आमच्या सरकारकडे आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
अर्ज भरण्यास मिळाली मुदतवाढ
दरम्यान, या योजनेबाबत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज भरता येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
ज्या महिलांचे अर्ज भरणे बाकी होते तसेच त्रुटी होत्या त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते.





