‘राष्ट्रहिताचा विचार ते करतात पण…”, किरेन रिजिजू यांची थरूर यांच्यावर टिपण्णी ; काँग्रेसला झोंबल्या मिरच्या

Kiren Rijiju on Shashi Tharoor। भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांदरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प आणि राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांनी, “भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत’ म्हणणे हे केवळ राजकीय भाषण आहे, तर वास्तव असे आहे की जागतिक मंदीच्या काळातही भारत ७.८% जीडीपी वाढ साध्य करत आहे. रिजिजू यांनी हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारताच्या ताकदीचे आणि योग्य धोरणांचे परिणाम” असल्याचे म्हटले.
अर्थव्यवस्थेवर रिजिजू काय म्हणाले? Kiren Rijiju on Shashi Tharoor।
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दिल्लीत माध्यमांशी बोलताना रिजिजू म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प आणि राहुल गांधी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत’ म्हटले. काही लोक यूट्यूब चॅनेल तयार करतात आणि वारंवार म्हणतात की भारत संपला आहे, लोकशाही संपली आहे, परंतु सत्य हे आहे की जगात आर्थिक मंदी असूनही, भारत सतत मजबूत होत आहे.”
मदरसा आणि आधुनिक शिक्षणावर मत
मदरशांविषयी विचारलेल्या प्रश्नावर रिजिजू म्हणाले की धार्मिक शिक्षण ठीक आहे, परंतु आजच्या काळात आधुनिक शिक्षण देखील त्यासोबत खूप महत्वाचे आहे. ते म्हणाले, “जर विद्यार्थ्यांना नोकऱ्या, वैज्ञानिक ज्ञान हवे असेल तर ते आधुनिक शिक्षणाद्वारेच शक्य आहे. म्हणून, मदरशांमध्येही आधुनिक शिक्षणाचा समावेश करणे आवश्यक आहे.”
काँग्रेस नेत्यांविषयी ‘हे’ विधान Kiren Rijiju on Shashi Tharoor।
रिजिजू यांनी काँग्रेसवरही भाष्य केले आणि म्हटले की, पक्षात शशी थरूरसारखे अनेक नेते आहेत जे देशाच्या हिताचा विचार करतात, परंतु त्यांच्या स्वतःच्या पक्षात उघडपणे बोलण्यास घाबरतात. पुढे त्यांनी बोलताना, “थरूर जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा काँग्रेसमध्येच त्यांचा विरोध आणि टीका केली जाते, जे लोकशाहीसाठी योग्य नाही” असे म्हणत काँग्रेसवर टीका केली.





