Kangana Ranaut : कपूर कुटुंबीयांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; कंगानाने साधला जोरदार निशाणा, थेट म्हणाली….

Kangana Ranaut | Narendra Modi | Raj Kapoor family : 14 डिसेंबर 1924 रोजी ‘राज कपूर’ यांचा जन्म झाला. यंदाचं वर्ष हे या शोमनच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. त्यांनी आपल्या आयुष्याच्या घटनांवर अनेक पटकथा लिहिल्या आणि चित्रपटासारखे ‘लार्जर दॅन लाइफ’ आयुष्यदेखील जगले. ‘शो’मॅन राज कपूर म्हणजे भारतीय सिनेसृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्न.
निळ्याशार डोळ्यांचा, विलक्षण प्रतिभा असणारा, दूरदृष्टी असणारा, संवेदनशील आणि अफाट अभिनयक्षमता, निर्मिती-दिग्दर्शनाचे कौशल्य असणारा जगावेगळा कलावंत. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेते, चित्रपट निर्माते असणार्या राज कपूर यांनी आपल्या अभिनय कौशल्याने सर्व रसिक प्रेक्षकांना केवळ प्रभावितच केले नाही तर अंतर्मुखही केले. सिनेसृष्टीला त्यांनी दिलेलं योगदान खूपच अमूल्य आहे.
दरम्यान, राज कपूर यांच्या 100 व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच राज कपूर कुटूंबाची भेट घेतली. यावेळी करिना कपूर, करिष्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट, आणि संपूर्ण कपूर कुटूंब उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी या ऐतिहासिक प्रसंगाच्या निमित्ताने राज कपूर यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
बॉलिवूड कलाकारांच्या या भेटवरून अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. कंगनाने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने बॉलिवूड कलाकार सतत पंतप्रधान मोदींची भेट का घेतात यावर भाष्य केलं. बॉलिवूड अनाथ आहे असं तिने म्हटलं.
कंगना म्हणाली कि, “मला वाटतं की आमच्या इंडस्ट्रीला मार्गदर्शनाची गरज आहे. ही सॉफ्ट पॉवर आहे आणि तिचा कमी वापर केला जातो. आज आपले पंतप्रधान असोत किंवा इतर कोणतेही मार्गदर्शक असोत किंवा माहिती आणि प्रसारण मंत्रालय असोत किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो, मी सुद्धा 20 वर्षांपासून या उद्योगाशी निगडीत आहे.”
“माझ्या मते हा उद्योग अनाथ आहे. कारण त्यांना मार्गदर्शन नाही. जिहादी अजेंडा असो की पॅलेस्टिनी अजेंडा, कोणीही त्यांना पकडू शकतो. त्यांना मार्गदर्शक नाही, त्यांना कुठे जायचे हे माहित नाही. काही पैसे दिले, काहीही मागवले. दाऊद त्यांना आपल्या पार्ट्यांमध्ये घेऊन जातो. अनेक वेळा ते हवाला-ड्रग्सचे लक्ष्य बनतात.
त्यांना असे वाटले पाहिजे की पंतप्रधान आमचे काम पाहत आहेत, जर ते आमच्याकडे पाहत असतील तर ते एक चांगले पाऊल आहे. आमचा उद्योग खूप मोठा आहे पण आम्हाला तेवढा मान मिळत नाही. मी पंतप्रधानांना भेटण्याची विनंती केली आहे, लवकरच भेटण्याची आशा आहे.” असं देखील अभिनेत्री यावेळी म्हणाली.
या भेटीदरम्यान, राज कपूर यांच्या कुटूंबीयांसोबत मोदींनी विविध आठवणींना उजाळा दिला. यावेळी राज कपूर यांच्या चित्रपटांच्या संगीताचा आणि अभिनयाचा गौरवही केला.





