जामखेड : ग्रामीण भागातील जनतेचा अतूट विश्वास असल्याने जनतेच्या अतूट विश्वासाला तडा न जाऊ देता पत्रकारांनी निष्पक्ष, निस्वार्थ, निधर्मी लेखणी करून पत्रकारितेचा उपयोग समाजविकासासाठी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावा, जाती- धर्माच्या पलीकडे जाऊन पत्रकारांनी वंचित, उपेक्षितांची बाजू मांडण्यासाठी लेखणी झिजवावी असे आवाहन वकील संघाचे अध्यक्ष ॲड प्रमोद राऊत यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ,जामखेड तालुका वकील संघ,आरंभ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कोर्ट रोड येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे,वसंत सानप,दीपक देवमाने,पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ओंकार दळवी,उपाध्यक्ष समीर शेख,सचिव संदेश हजारे,कार्याध्यक्ष सचिन अटकरे,प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नयूम सुभेदार,राष्ट्रवादीचे अमर चाऊस,भुजंग दळवी,विक्रम जमदाडे,संजय फुटाणे,रमजान मदारी,अमोल चौरे,चेतन राळेभात आदींसह नागरिक उपस्थित होते. यावेळी वसंत सानप यांनी पत्रकारांना महाभारतातील संजयची उपमा देत दूरदृष्टी ठेऊन पत्रकारिता करावी जेणेकरून समाज घडेल.समाजातील दुर्लक्षित घटकाला न्याय मिळेल.असे प्रतिपादन केले. यावेळी जामखेड वकिल संघाच्या अध्यक्षपदी ॲड प्रमोद राऊत यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.