‘भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर त्यांचा नॉर्थईस्ट ताब्यात घ्या’; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचा सरकारला सल्ला

Jammu Kashmir Terror Attack । पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. पाकिस्तानविरुद्ध कारवाईची मागणी सातत्याने होत आहे. दरम्यान, बांगलादेशचे निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल एएलएम फजलुर रहमान यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे.
बांगलादेश रायफल्सचे माजी प्रमुख आणि मोहम्मद युनूस यांचे निकटवर्तीय फजलुर रहमान यांनी, “जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर आपण या संधीचा फायदा घेऊन ईशान्येकडील भाग काबीज केला पाहिजे. ” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. बांगलादेशचे निवृत्त मेजर जनरल एएलएम फजलुर रहमान यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत हे विधान केले आहे. त्यासोबतच संयुक्त लष्करी व्यवस्थेबाबत आपण चीनशी चर्चा सुरू केली पाहिजे.” असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला आहे.
फजलुर रहमान कोण आहे? Jammu Kashmir Terror Attack ।
युनूस सरकारने गेल्या वर्षीच फजलुर रहमान यांना एका संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. २००९ मध्ये बांगलादेशात झालेल्या पिलखाना हत्याकांडात ५७ लष्करी अधिकाऱ्यांसह ७४ लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी रेहमान यांना ७ सदस्यीय स्वतंत्र आयोगाचे प्रमुख बनवण्यात आले आहे. या घटनेला बांगलादेश रायफल बंड, पिलखाना दुर्घटना आणि पिलखाना हत्याकांड असेही म्हणतात.
बांगलादेश सरकारने फजलुर रहमान यांच्या या विधानापासून स्वतःला दूर ठेवले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार यांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी त्यांचे विधान वैयक्तिक असल्याचे सांगितले. बांगलादेश सरकारचा त्यांच्या विधानाशी काहीही संबंध नाही.
‘रहमानच्या विधानात बांगलादेशला ओढू नये’ Jammu Kashmir Terror Attack ।
शफीकुल आलम यांनी बुधवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करून, “युनूस सरकार भारताच्या ईशान्येविरुद्ध अशा कोणत्याही प्रक्षोभक विधानाचे समर्थन करत नाही. बांगलादेश सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा आदर करतो. ते पुढे म्हणाले की, निवृत्त मेजर जनरल फजलुर रहमान यांच्या या विधानात बांगलादेश सरकारला ओढू नये. सरकार त्यांच्या विधानाचे अजिबात समर्थन करत नाही.” असे स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा
“सिंधू नदीवर धरण बांधले तर आम्ही हल्ला करू” ; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याची पुन्हा भारताला धमकी





