Jamkhed News : संत वामनभाऊ महाराज दिंडीत ‘आरंभ फाऊंडेशन’कडून वारकऱ्यांना सेवा; पाणी आणि बिस्किटांचे वाटप
विठू माऊलीच्या दर्शनाची आस लागलेले हजारो वारकरी, टाळ-मृदंगाचा गजर आणि 'ज्ञानोबा-तुकाराम', 'संत वामनभाऊ महाराज की जय' अशा जयघोषाने अवघ शहर (Jamkhed News) भक्तीमय झाले होते.

Jamkhed News : विठू माऊलीच्या दर्शनाची आस लागलेले हजारो वारकरी, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘संत वामनभाऊ महाराज की जय’ अशा जयघोषाने अवघ शहर (Jamkhed News) भक्तीमय झाले होते.
श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या दिंडीचे जामखेड (Jamkhed News) शहरात मोठ्या उत्साहात आगमन झाले.
याच भक्तीमय वातावरणात सामाजिक बांधिलकी जपत आरंभ फाऊंडेशनच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांसाठी पाणी बॉटल आणि बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे आणि वारकरी सेवेचे दिंडी सोहळ्यातील (Jamkhed News) प्रमुख तसेच नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.
पायी दिंडी जामखेड शहरात दाखल झाली. या दिंडीतील हजारो वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी ‘आरंभ फाऊंडेशन’च्या वतीने जामखेड शहरातील जय हिंद चौकात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणे हेच परमेश्वर पूजनासारखे आहे, ही भावना मनात ठेवून ‘पलक कॉस्मेटिक’चे संचालक वेदांत दळवी आणि ‘रामदेवजी शू मार्ट’चे संचालक चेतन राळेभात यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या संकल्पनेतून सर्व वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किट पुड्यांचे वाटप करून त्यांची तृष्णा भागवण्यात आली.
केवळ अन्न-पाणी वाटप करून हे तरुण थांबले नाहीत, तर त्यांनी सामाजिक भान जपत एक आदर्श पायंडा घालून दिला. जय हिंद चौकातून हजारो वारकऱ्यांची दिंडी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर, रस्त्यावर पडलेले पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, बिस्किटांचे कागद आणि इतर कचरा ‘आरंभ फाऊंडेशन’च्या सदस्यांनी स्वतः हातात गोण्या घेऊन गोळा केला.
अवघ्या काही वेळातच सदस्यांनी संपूर्ण जय हिंद चौक स्वच्छ केला. दिंडी सोहळ्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावून या तरुणांनी दिलेल्या ‘स्वच्छतेच्या संदेशाचे’ जामखेड शहरात आणि परिसरातून मोठे कौतुक होत आहे.
या सेवाकार्य आणि स्वच्छता मोहिमेप्रसंगी समाजातील विविध स्तरांतील मान्यवर आणि आरंभ फाऊंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने बापुसाहेब कार्ले, पत्रकार ओंकार दळवी,अमोल आंधळे, पत्रकार प्रकाश खंडागळे, पत्रकार समिर शेख, अमर चाऊस, भुजंग दळवी, चिन्मय राजगुरू, संजय फुटाणे, पांडुरंग कोल्हे, किरण भोरे, पोपट कार्ले, ऋषीकेश ठाकरे, प्रनय पाल, अथर्व औचरे, भरत आटोळे,विशाल लोळगे. विनोद लोळगे संजय मोरे, सोमनाथ खवळे, शंकर डाडर, बाबू आंधळे आदींसह फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जमादारवाडी येथील श्री संत गहिनीनाथ गड येथे दिंडीचा अत्यंत भव्य आणि नेत्रदीपक रिंगण सोहळा पार पडला. टाळ-मृदंगाच्या तालावर फेर धरणारे वारकरी, अश्वांच्या नेत्रदीपक दौडी आणि माऊलींचा जयघोष पाहून उपस्थित हजारो भाविक भक्तांचे डोळे पाणावले. या नयनरम्य सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर या प्रवासात ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या दिंडीत अनेक संस्था सेवा करत असतात. मात्र, जामखेड शहराच्या मध्यवर्ती भागात विठ्ठल भक्तांची सेवा केल्यानंतर, परिसर स्वच्छ ठेवून आरंभ फाऊंडेशनच्या तरुणांनी दाखवलेली ही तत्परता, शिस्त आणि सेवाभाव पाहून दिंडीतील ज्येष्ठ वारकऱ्यांनी, पालखी सोहळा प्रमुखांनी आणि स्थानिक नागरिकांनी सर्वांवर कौतुकाचा वर्षाव करत भरभरून आशीर्वाद दिले.






