Jamkhed News : जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त भगवान शंकराच्या मूर्तीवर भव्य दिव्य विद्युत रोषणाई
Jamkhed News : श्री नागेश्वर महाराज यात्रेनिमित्त जामखेडमधील विंचरणा नदीकाठावर उभारण्यात आलेल्या भव्य शिवमूर्तीवर नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसर भक्तीमय झाला आहे.

Jamkhed News : महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असलेल्या जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त आणि १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) औचित्य साधून जामखेड शहरातील विंचरणा नदीकाठी असलेल्या भव्य दिव्य भगवान शंकराच्या मूर्तीवर नयनरम्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (Jamkhed News)
मैत्री ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष: सागर सुभाष गवसने ऊर्फ (मराठा आणि आमदार रोहित दादा पवार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला असून यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय आणि तेजोमय झाला आहे. (Jamkhed News)
शहराच्या वैभवात भर घालणारा उपक्रम
जामखेड-नगर रस्त्यावरील विंचरणा नदीकाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून भगवान शंकराची भव्य व आकर्षक मूर्ती उभारण्यात आली आहे. ही मूर्ती जामखेड शहराच्या सौंदर्यात आणि धार्मिक वैभवात मोठी भर घालत आहे.
नागपंचमी व श्री नागेश्वर यात्रेचे औचित्य साधून या परिसराला आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी झगमगणारे दिवे आणि नदीकाठचे निसर्गरम्य वातावरण यामुळे भाविक व नागरिक ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. (Jamkhed News)
राज्यात प्रसिद्ध असलेली जामखेडची यात्रा
जामखेडची नागेश्वर यात्रा ही केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री नागेश्वर मंदिराजवळ हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन होतात. (Jamkhed News)
तसेच राज्यभरातील नामवंत पैलवान या मैदानात आपली कुस्तीची कला दाखवतात.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची विविध पाळणे व खेळणी.नर्तकींचे डाव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. (Jamkhed News)
धार्मिक परंपरेचा वारसा जपत आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मैत्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर गवसने (मराठा) तसेच आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाने राबवलेल्या या रोषणाईच्या उपक्रमाचे जामखेड शहरातील नागरिक व भाविकांमधून तीव्र कौतुक होत आहे. यात्रेनिमित्त शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Jamkhed News)





