मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा
धुळे : राज्यातील पुरपरिस्थिती निवळल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा नव्या जोमाने महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान आम्ही यात्रा सुरू केल्यानंतर विरोधकांना यात्रा काढण्याची प्रेरणा मिळाली आहे, असा बोलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सरकारकडून काढण्यात आलेली महाजनादेश यात्रा धुळ्यात असताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.
Day-8Interacting with media on #MahaJanadeshYatra in Dhule https://t.co/8SrufqdEUS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 23, 2019
महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. आम्ही महाजनादेश यात्रा काढल्यानंतर अनेक पक्षांना यात्रा काढण्याची प्रेरणा मिळाली आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. पण खरंतर यात्रा काढण्याची परंपरा ही भाजपाची आहे. आम्ही विरोधात असताना संघर्ष यात्रा काढली होती. आता आम्ही संवाद यात्रा काढत आहोत. आमच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे सरकारच आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकते, असा विश्वास लोकांच्या मनात दिसून येत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच राष्ट्रवादीने सुरू केलेल्या यात्रेची काय परिस्थिती झाली आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. दुसरीकडे कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराची जत्रा निघाल्याने त्यांच्या यात्रेचे काय होईल ते माहित नाही,असे म्हणत विरोधकांना टोला लगावला.