मुंबई – चित्रपटसृष्टीत अनेकदा दोन अभिनेत्रींमध्ये विभक्त झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. एकमेकांना मागे टाकण्यापासून ते वैयक्तिक कारणांपर्यंत कधी-कधी अभिनेत्रींच्या मैत्रीत दुरावा निर्माण होतो. काहीवेळा हा वाद बराच काळ चालतो, पण काही वेळा वाद लवकर थंडावतात. असाच एक किस्सा अभिनेत्री अमृता राव आणि इशा देओलमध्ये झाला होता. यावेळी ईशाने शूटिंगदरम्यान अमृताच्या थेट कानाखाली लगावली होती.
ही घटना त्यावेळची आहे जेव्हा दोघी 2005 मध्ये ‘प्यारे मोहन’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक इंद्र कुमार करत होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एके दिवशी अमृताने ईशाला मस्करीत काही अपशब्द बोलले, त्यानंतर ईशा संतापली आणि तिला राग अनावर झाला. अपशब्द ईशाला सहन झाले नाही आणि तिने थेट शूटिंगदरम्यान अमृताच्या कानशिलात लगावली.
ईशाने स्वतः हा किस्सा एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता. ‘शुटिंग संपल्यानंतर एक दिवस अमृताने दिग्दर्शकासमोर मला शिवीगाळ केली असल्याचे इशाने यावेळी सांगितलं. त्यामुळे तिने अमृताच्या कानशिलात लगावली. एवढच नाही तर अमृताला तिची चूक समजल्यानंतर तिने आपली माफी देखील मागितल्याचे ईशा सांगते.
ईशा आणि अमृता या दोन्हही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहेत. सध्या दोघीही त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. ईशाने भरत तख्तानीसोबत लग्न केले आहे. त्याचबरोबर अमृताने आरजे अनमोलची जोडीदार म्हणून निवड केली आहे.