नवी दिल्ली – एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मणिपूरवर केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान लोकसभेत भाषण केले. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना भाजपच्या ‘छोडो भारत’ मोहिमे’वरून घेरले. भाजप तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप ओवेसी यांनी यावेळी केला.
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “गृहमंत्र्यांनी काल (बुधवार) भारत छोडो म्हटले.. भारत छोडोचा नारा एका मुस्लिमाने दिल्याचे त्यांना समजले तर ते हा शब्द वापरणार नाहीत. त्यांना माहित नसेल भारत छोडोचा नारा दिला तो युसूफ मेहर अली होते.
ते पुढे म्हणाले, “मला असे म्हणायचे आहे की तुम्ही (केंद्र सरकार) ज्या प्रकारचे राजकारण करत आहात त्यामुळे देशाचे नुकसान होईल. मला पंतप्रधानांना विचारायचे आहे की देशापेक्षा हिंदुत्व महत्त्वाचे आहे का.? भारत छोडो हा नारा द्यायचाच असेल तर तुम्हाला म्हणावे लागेल चीन भारत छोडो, गोरक्षकांना सांगा भारत छोडो. ओवेसी म्हणाले की, तुम्ही चीनवर गप्प बसला आहात आणि चीन देशात घुसत आहे.
#WATCH | AIMIM MP Asaduddin Owaisi, says “Our Home Minister was talking about ‘Quit India’ yesterday. I wonder if he gets to know that the word ‘Quit India’ was coined by a Muslim, he will not use this word. I want to say that the kind of politics you (Central govt) are doing… pic.twitter.com/KCKREpl5Hl
— ANI (@ANI) August 10, 2023
या सगळ्यात असदुद्दीन ओवेसी यांनी मणिपूरवरून मोदी सरकारवर शायरी करत टीका केली ते म्हणाले, “कुर्सी है ये तुम्हारा जनाजा तो नहीं, कुछ कर नहीं सकते, तो कुर्सी से उतर क्यों नहीं जाते?”