Retail inflation: इराण अमेरिका युद्ध सुरू होण्यापूर्वीच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात भारतातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर वाढवून 3.21 टक्क्यांवर गेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये या महागाईचा दर 2.75 टक्के होता. 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले. त्यामुळे मार्च महिन्यातील आकडेवारी चिंताजनक पातळीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. रिझर्व बँकेने महागाईचा दर चार टक्क्याच्या आत रोखण्याचे ठरविले असताना फेब्रुवारी महिन्यामध्ये तो 3.21 टक्के झाला आहे. मार्च महिन्यामध्ये हा दर 4% पर्यंत वाढू शकतो असे समजले जात आहे. तसे झाले तर रिझर्व बँक आगामी काळात व्याजदर कपात करणार नाही. उलट महागाईचा दर जास्त झाला तर व्याजदर वाढीच्या शक्यतेवरही विचार करू शकते. आज जाहीर झालेली महागाईची आकडेवारी 2024 च्या संदर्भ वर्षानुसार जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये कसलीही त्रुटी नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये अन्नधान्याची महागाई जानेवारीच्या 2.13% च्या तुलनेत 3.47% वर गेली आहे. हेही वाचा – ‘शेजारील अरब देशांवर हल्ले सुरूच राहणार’; इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा मोठा इशारा, जगात खळबळ काही विश्लेषकानी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात सोने आणि चांदीचे दर उच्च पातळीवर होते. त्याचबरोबर हिरे आणि प्लॅटिनमच्या किमती वाढल्या होत्या. त्यामुळे एकूण महागाईवर या धातूच्या महागाईचा परिणाम झालेला आहे. इतर जीवनावश्यक वस्तूच्या किमती अजूनही आटोक्यात आहेत. मात्र नारळ, टोमॅटो आणि गोबीच्या किमती फेब्रुवारी महिन्यामध्ये वाढल्या. तर अद्रक, कांदे. बटाटे, उडीद डाळ इत्यादीच्या किमती कमी झाल्या आहेत. केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील महागाईचा दर 3.37% होता तर शहरी भागातील मागायचा दर 3.02% होता. म्हणजे ग्रामीण भागात उन्हाळ्यामुळे महागाईचा दर वाढला असल्याचे दिसून येत आहे. सोने, चांदी, प्लॅटिनम आणि हिरे वगळता इतर जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढलेल्या नाहीत. त्यामुळे महागाई हाताबाहेर जाण्याची शक्यता कमी आहे असे काही विश्लेषकांना वाटते. मात्र मार्च महिन्यामध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. त्यामुळे खाण्यापिण्याचा खर्च वाढणार आहे. अशा अवस्थेत महागाई वाढू शकते असे दिसून येते.