India vs South africa 2nd Test at Newlands, Cape Town : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. यजमान संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताची नजर दुसरी कसोटी 1-1 अशी बरोबरीत संपवण्याकडे असेल, तर दक्षिण आफ्रिकेची नजर टीम इंडियाला क्लीन स्वीप करण्याकडे असेल.
क्लीन स्वीप टाळणे हे रोहित शर्मा आणि संघासाठी सोपं नसेल. खरंतर केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिलं आहे, भारताला या मैदानावर आजपर्यंत एकही विजय नोंदवता आलेला नाही. रोहित शर्मा केपटाऊनमध्ये तिरंगा फडकावून इतिहास रचणार का हे पाहणं औत्सुकतेचे असेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये होणार आहे. यासाठी टीम इंडियाने सराव सुरू केला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता संघ पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे भारताचा विक्रम चांगला राहिला नाही. येथे टीम इंडियाने अद्याप दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
भारताने आतापर्यंत केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात टीम इंडियाला 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. केपटाऊनमध्ये 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सामन्यात भारतासाठी आव्हान पेलणे सोपे नसेल. टीम इंडियाकडे विराट कोहली, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरसारखे दिग्गज खेळाडू आहेत. मात्र तरीही अखेरच्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. केएल राहुलने पहिल्या डावात शतक झळकावले होते. मात्र दुसऱ्या डावात 4 धावा करून तो बाद झाला.
टीम इंडियाने पहिला कसोटी सामना 1993 मध्ये केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. हा सामना अनिर्णित राहिला. यानंतर 1997 मध्ये झालेल्या सामन्यात भारताला 282 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 2007 मध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेट्सनी पराभव झाला होता. 2011 मध्ये खेळलेला सामनाही अनिर्णित राहिला होता. यानंतर भारतीय संघ 2018 आणि 2022 मध्ये खेळलेले सामनेही हरले. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये स्पर्धा होणार आहे.
#AUSvPAK Test Series : अखेरच्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ धडाकेबाज सलामावीर होणार निवृत्त…
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला केपटाऊनमध्ये इतिहास रचण्याची संधी आहे. टीम इंडियाला येथे पहिली कसोटी जिंकण्याची चांगली संधी आहे. भारतीय संघ या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल करू शकतो.